शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

Narendra Modi: जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होणार; ३ तासांच्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 9:04 PM

PM Narendra Modi meeting with political leaders from Jammu and Kashmir: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरच्या नेत्यांमध्ये जवळपास ३ तास बैठक सुरू होती

ठळक मुद्देया बैठकीत कोणीही पाकिस्तानचं नाव घेतलं नाही. विना अजेंडा खुल्या मनाने या बैठकीत चर्चा झाली.सुप्रीम कोर्टाला कलम ३७० वर अखेरचा निर्णय घ्यायला हवा होता, काँग्रेसची भूमिका काश्मीरबाबत संभ्रम दूर झाला. जम्मू काश्मीरसाठी आजचा दिवस मोठा आहे.

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जम्मू काश्मीरच्या नेत्यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली. डी लिमिटेशननंतर काश्मीरात निवडणूक होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरच्या नेत्यांना सांगितलं. काश्मीरमधील सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वातावरण तयार करायला हवं. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी १० मिनिटं संबोधित केले. सर्वपक्षीय बैठकीत कलम ३७० हटवण्याबाबतही मुद्दा उपस्थित झाला.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सांगितले की, डी-लिमिटेशननंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येतील. दिल्ली आणि दिल यातील दूरी मिटवण्याची इच्छा आहे. काश्मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. काश्मीरात लोकशाही मजबूत करण्यावरही चर्चा झाली. काश्मीरच्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित भावना निर्माण करायला हवी. आपल्या सर्वांना जम्मू काश्मीरच्या युवकांना सुरक्षित ठेवायला हवं असं त्यांनी सांगितले.

 

जवळपास ३ तास चालली बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरच्या नेत्यांमध्ये जवळपास ३ तास बैठक सुरू होती. जम्मू काश्मीरच्या १४ नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांसमोर त्यांचे म्हणणं मांडलं. या बैठकीत मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुला यांनी कलम ३७० चा मुद्दा काढला. मुजफ्फर बेग यांनी मेहबुबा यांना रोखलं तर बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० चा उल्लेखही काढला नाही.

 

काश्मीरबाबतचा संभ्रम दूर झाला – अल्ताफ बुखारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर जम्मू काश्मीरच्या अपनी पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी म्हणाले की, काश्मीरबाबत संभ्रम दूर झाला. जम्मू काश्मीरसाठी आजचा दिवस मोठा आहे. पंतप्रधान मोदींनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. काश्मीरमध्ये डी लिमिटेशननंतर निवडणुका घेण्यात येतील असं सांगितले.

 

काँग्रेसनं ५ मोठ्या मागण्या ठेवल्या – गुलाम नबी आजाद

पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काँग्रेसनं ५ मोठ्या मागण्या ठेवल्या. काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद म्हणाले की, काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन केले जावं. जम्मू आणि काश्मीरात लवकरच निवडणुका घेण्यात याव्यात. निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा. डोमिसाइल आणि राजकीय कैद्यांची सुटका व्हावी अशी मागणी केली. या बैठकीत कोणीही पाकिस्तानचं नाव घेतलं नाही. विना अजेंडा खुल्या मनाने या बैठकीत चर्चा झाली. मागील वर्षीच पंतप्रधानांनी काश्मीरी नेत्यांना भेटायला हवं होतं. कलम ३७० हटवण्याबाबत सहमती घेतली नव्हती. त्याचसोबत सुप्रीम कोर्टाला कलम ३७० वर अखेरचा निर्णय घ्यायला हवा होता असं त्यांनी सांगितले.

डी लिमिटेशन म्हणजे काय?

निवडणूक आयोगानुसार देश किंवा विधीमंडळ असलेल्या प्रांतात क्षेत्रीय मतदारसंघाच्या(लोकसभा किंवा विधानसभा) मर्यादा किंवा सीमा निश्चित करणे, मतदारसंघाची सीमा ठरवणे. निवडणुका सुरळीत आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी या प्रक्रियेचा वापर करून चांगल्या कारभाराचं उद्दिष्ट साध्य केले जाते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक