शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Election Result 2023: 'हा काँग्रेसचा पराभव, ना की...'; 3 राज्यांतील भाजप विजयावर ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 18:22 IST

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढविल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला, असे आघाडीतील मित्रपक्षांनी म्हटले आहे.

यातच, तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख ममता बनर्जी यांनी सोमवारी भाजपच्या विजयासंदर्भात प्रतिक्रिया देताना, "काँग्रेसने इंडिया अलायन्समधील इतर सदस्यांवर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासंदर्भात विश्वास ठेवला नाही. ज्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर हा काँग्रेसचा पराभव आहे, ना की  जनतेचा, असेही ममता यांनी म्हटले आहे.

"काँग्रेसने तेलंगणामध्ये विजय मिळवला. त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातही विजय मिळाला असता. काही मते इंडिया अलायन्समधील पक्षांमुळे कमी झाली. आम्ही जागावाटपाचा सल्ला दिला होता, हे खरे आहे," असेही ममता म्हणाल्या. 

'2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही' -ममता म्हणाल्या, "विचारधारेबरोबरच आपल्याला एका रणनीतीचीही आवश्यकता आहे. अशात जर जागावाटपावर एकमत झाले, तर भाजप 2024 मध्ये सत्तेवर येणार नाही. इंडिया अलायन्स पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी एकत्रीत काम करेल आणि चुका सुधारेल."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा