शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

'निवडणूक रोख्यांची योजना म्हणजे फुसका बार'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 4:38 AM

निवडणूक निधीसाठी केंद्र सरकारने अमलात आणलेली निवडणूक रोख्यांची योजना फुसका बार निघाली, अशी टीका माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केली आहे. 

जयपूर : निवडणूक निधीसाठी केंद्र सरकारने अमलात आणलेली निवडणूक रोख्यांची योजना फुसका बार निघाली, अशी टीका माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुका लढविण्यासाठी काळा पैसा वापरू नये हा उद्देश सफल व्हायच्याऐवजी त्या गैरकृत्यासाठी ही योजनाच सहाय्यभूत ठरली असेही ते म्हणाले. नवीन चावला यांनी लिहिलेल्या ‘एव्हरी व्होट काऊंट्स : दी स्टोरी ऑफ इंडियाज इलेक्शन' या पुस्तकाचे शनिवारी जयपूर लिटरेचन फेस्टिवलमध्ये प्रकाशन झाले. त्यावेळी पत्रकार एन. राम यांनी त्यांची मुलाखत घेतली.त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नवीन चावला म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत असो किंवा नोटाबंदीसारखे निर्णय घेतलेले असो, देशात काळ््या पैशाचा महासागर कायमच आहे. त्यातून राजकीय पक्षांना होणारा पैशाचा पुरवठा अजूनही थांबलेला नाही. तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी आयोगाचा वचक निर्माण केला. त्यामुळे निवडणूक आयोग इतका स्वतंत्र बाण्याने काम करू लागला की, निवडणुकांच्या तारखा ठरविताना कार्यकारी मंडळाशी चर्चा करण्याची गरज भासली नाही. निवडणूक खर्चाची घालून दिलेली मर्यादा नेहमीच ओलांडली गेली आहे. जनतेचा आवाज बनण्याऐवजी राजकारणी संसदेच्या माध्यमातून श्रीमंत व सामर्थ्यशाली होण्याचा प्रयत्न करत आहेत. असे होणे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. निवडणुकांतील गैरप्रकार थांबायलाच हवेत, असेही चावला म्हणाले.अंतिम निकाल येईपर्यंत ईव्हीएमवर विश्वास ठेवा२०१० ते २०१४ या कालावधीत देशात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्च केले. त्यातील निम्मा पैसा बेहिशेबी होता, असे सेंटर फॉर मीडिया स्टडीजने म्हटले आहे.त्याबद्दल नवीन चावला म्हणाले की, ही अतिशय चिंताजनक स्थिती आहे. ईव्हीएम हे संगणकांना जोडले नाहीत, तर त्यांचे हॅकिंग होण्याची शक्यता उरणार नाही. या यंत्रांविरोधात प्रदीर्घ न्यायालयीन लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निकाल देईपर्यंत ईव्हीएमवर तूर्त विश्वास ठेवायला हवा.

टॅग्स :Electionनिवडणूक