शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मिशन २०२४ : दक्षिणेकडील गड भेदण्यासाठी PM नरेंद्र मोदी मैदानात; भाजपाचा साऊथ प्लॅन काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 08:25 IST

मिशन साऊथमध्ये भाजपाचे लक्ष कर्नाटक, तेलंगणानंतर आता तामिळनाडूवर आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय तामिळनाडू, केरळ, लक्षद्विपच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी पहिल्या दिवशी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले. त्यानंतर भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला हजेरी लावली. जवळपास २० हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधानांनी तामिळनाडूत केले. निवडणुकीच्या वर्षात पंतप्रधान मोदींचा हा राज्यातील पहिलाच दौरा आहे.त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि भाजपाचे मिशन साऊथ या दृष्टीने पाहिले जात आहे. दक्षिणेत विस्तारासाठी भाजपाची रणनीती काय आहे? त्याआधी दक्षिणेत भाजपासाठी काय आव्हाने आहेत हे जाणून घ्यायला हवे. दक्षिणेकडील राज्यात भाजपासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षाचा हिंदी भाषिक राज्याकडील प्रतिमेतून बाहेर पडणे. भाजपानं दक्षिणेकडील मोहिम फत्ते करण्यासाठी पंतप्रधान मोदींना मैदानात उतरवलं आहे.

दक्षिण भारतात राजकीय पाऊल ठेवण्यासाठी भाजपा सांस्कृतिक, प्रादेशिकवाद, भ्रष्टाचार यावर झीरो टॉलरेंससह केंद्र सरकारच्या विकास योजनांच्या आधारे स्वत:ची विश्वासार्हता बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मिशन साऊथमध्ये भाजपाचे लक्ष कर्नाटक, तेलंगणानंतर आता तामिळनाडूवर आहे. मागील २०२१ च्या निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपाला ४ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे इथं भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु त्यावेळी भाजपानं एआयएमडीएमकेसोबत आघाडी करून निवडणूक लढली होती. जी आघाडी आता तुटलेली आहे.

तामिळनाडूत भाजपानं रणनीतीमध्ये बदल केले आहेत. भाजपानं तामिळ राज्यात शिरकाव करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसीला केंद्र बनवून सांस्कृतिक राष्ट्रवाद पाया रचण्याची तयारी केली आहे. २०२२ मध्ये पहिल्यांदा काशी तामिळ संगममचं आयोजन झाले होते. अलीकडेच दुसरे काशी तामिळ संगममचे आयोजन झाले. त्यात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. मोदींनी संबोधित करताना तामिळ साधू, संत कवी आणि महापुरुषांचा उल्लेख केला. तामिळनाडूत भाषावाद कायम चर्चेत राहतो. अशावेळी मोदींनी भाषा आणि संस्कृतीवर भाष्य करणे हे या रणनीतीचा भाग मानले जात आहे. 

दक्षिणेत कर्नाटक राज्य सोडलं तर इतर राज्यात भाजपाला संघटना उभी करता आली नाही. मागील काही काळापासून तेलंगणा, तामिळनाडूसह केरळ आणि दुसऱ्या राज्यात संघटना उभारण्यावर भाजपानं जोर दिला आहे. भाजपानं त्यासाठी तेलंगणा मॉडेल पुढे करून कामाला सुरुवात केली आहे. तेलंगणात भाजपाने तत्कालीन केसीआर सरकारविरोधात भ्रष्टाचार आणि बिघडलेली कायदा सुव्यवस्था यावरून रस्त्यावर आंदोलन केले होते. आता भाजपा हीच रणनीती तामिळनाडू वापरणार आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडीचं गणित जुळवण्यासाठी भाजपाने लोकप्रिय नेत्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात कर्नाटकात एचडी देवगौडा यांची जनता दल सेक्यूलर, आंध्र प्रदेशात पवन कल्याण यांची जनसेना पार्टी यांचा समावेश आहे. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, याठिकाणचे ४ लोकप्रिय चेहऱ्यांपैकी पीटी ऊषा, इलैयाराजा, वीरंद्र हेगडे आणि वी. विजेयंद्र प्रसाद यांना राज्यसभेत पाठवणेही भाजपाच्या या रणनीतीचा भाग आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक