शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

निवडणुक आयोगाच्या दणक्याने चौकीदारांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 12:33 IST

वारंवार होणाऱ्या आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या प्रकरणी नोटीस देऊन उत्तर मागवले आहे. मोदींनी दूरदर्शन वाहिनीवर केलेलं भाषण असो किंवा नमो टीव्हीवर भाजपचा सर्रास होणारा प्रचार असो.

मुंबई – देशात आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाने सुरू केलेलं सर्जिकल स्ट्राईक भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची डोकेदुखी ठरत आहे. वारंवार होणाऱ्या आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या प्रकरणी नोटीस देऊन उत्तर मागवले आहे. मोदींनी दूरदर्शन वाहिनीवर केलेलं भाषण असो किंवा नमो टीव्हीवर भाजपचा सर्रास होणारा प्रचार असो.लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यापासून भाजपकडून वेळोवेळी आचारसंहिता भंग करण्यात येत असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे. ३१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार" या मोहिमेसाठी दूरदर्शन वाहिनीवर दीड तास भाषण केले. त्यानंतर करण्यात आलेल्या तक्रारीनंतर निवडणुक आयोगाने आचारसंहिता भंग झाल्याचं ठपका ठेवला आहे. त्यामुळे भाजपची " मै भी चौकीदार" मोहीम अडचणीत आली. निवडणुक आयोगाची परवानगी न घेताच हा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्यात आला होता. व्हिडिओमध्ये जवानांचा वापर करण्यात आला असल्याने निवडणुक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.लोकसभा निवडणुकीत भाजप वेळोवेळी आचारसंहिता भंग करत असल्याचे आरोप करत विरोधकांनी टीका सुरू केली आहे. दुसरीकडे निवडणुका जाहीर होताच 'नमो टीव्ही' चॅनेल सर्वत्र दाखवले जात आहे. आचारसंहिता लागू असून सुद्धा सर्रासपणे यावर मोदींचे भाषण व भाजपचा प्रचार केला जात आहे. यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याने निवडणूक आयोगाने याप्रकरणी सूचना प्रसारण मंत्रालयला नोटीस बजावली आहे.

भाजपकडून आचारसंहितेचा भंग होत असताना निवडणूक आयोगाकडून मात्र नोटीस देण्याव्यातिरिक्त कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता आल्यावर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू, असे म्हटले नसेल ना ?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा