शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

क्लीन चिटवरून निवडणूक आयोगामध्ये फूट? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 17:42 IST

सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असतानाच निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे.

नवी दिल्ली -  सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असतानाच निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना निवडणूक आचारसंहिता भंगप्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यावरून हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगातील सर्व सदस्यांचे सर्वच बाबतीत एकमत असण्याची आवश्यकता नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी म्हटले आहे. मोदी आणि अमित शहा यांना आचारसंहिता भंगप्रकरणी क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. या वृत्तानुसार निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांना एक पत्र लिहिले असून, तीन निवडणूक आयुक्तांपैकी कुणाचेही कुठल्याही मुद्यावर वेगळे मत असल्यास संबंधित आदेशामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख असावा असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चिट देण्याच्या मुद्द्यावर अशोक लवासा हे  अन्य दोन निवडणूक आयुक्तांसोबत असहमत होते. तसेच आपले विरोधी मत रेकॉर्डमध्ये नमूद करावे, असे त्यांचे मत होते. तसेच आपल्या मताप्रमाणे व्यवस्था होईपर्यंत आपण निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. हा विवाद टाळता आला असता, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच सर्व मुख्य निवडणूक अधिकारी आणि त्यांची पथके रविवारी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आणि 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीत गुंतले असताना हा विवाद समोर आला आहे. सार्वजनिकरीत्या होणाऱ्या वादविवादांना माझा विरोध नाही. मात्र प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा