शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

क्लीन चिटवरून निवडणूक आयोगामध्ये फूट? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 17:42 IST

सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असतानाच निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे.

नवी दिल्ली -  सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असतानाच निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना निवडणूक आचारसंहिता भंगप्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यावरून हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगातील सर्व सदस्यांचे सर्वच बाबतीत एकमत असण्याची आवश्यकता नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी म्हटले आहे. मोदी आणि अमित शहा यांना आचारसंहिता भंगप्रकरणी क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. या वृत्तानुसार निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांना एक पत्र लिहिले असून, तीन निवडणूक आयुक्तांपैकी कुणाचेही कुठल्याही मुद्यावर वेगळे मत असल्यास संबंधित आदेशामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख असावा असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चिट देण्याच्या मुद्द्यावर अशोक लवासा हे  अन्य दोन निवडणूक आयुक्तांसोबत असहमत होते. तसेच आपले विरोधी मत रेकॉर्डमध्ये नमूद करावे, असे त्यांचे मत होते. तसेच आपल्या मताप्रमाणे व्यवस्था होईपर्यंत आपण निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. हा विवाद टाळता आला असता, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच सर्व मुख्य निवडणूक अधिकारी आणि त्यांची पथके रविवारी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आणि 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीत गुंतले असताना हा विवाद समोर आला आहे. सार्वजनिकरीत्या होणाऱ्या वादविवादांना माझा विरोध नाही. मात्र प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा