शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार निवडणूक आयुक्त? कधी होणार निर्णय, जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 18:33 IST

Election Commission of India: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना केंद्रीय निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना केंद्रीय निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगात अनूप पांडे यांच्या निवृत्तीनंतर एक पद रिक्त होते. त्यातच अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. आता  केंद्र सरकार निवडणूक आयोगामध्ये नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी बैठक आयोजित करू शकते. 

अरुण गोयल हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच पश्चिम बंगालमध्ये गेले होते. मात्र हा दौरा पूर्ण झाल्यानंतर औपचारिता म्हणून झालेल्या पत्रकार परिषदेत ते सहभागी झाले नव्हते. त्यांच्या ऐवजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. तसेच गोयल हे प्रकृतीच्या समस्येमुळे पत्रकार परिषदेत सहभागी झालेले नाहीत, असे त्यांनी सांगितले होते.  

दरम्यान, आता केवळ एक सदस्यीय निवडणूक आयोगासह लोकसभा निवडणुकीत समान संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू होण्यापूर्वी सरकार येणाऱ्या काही दिवसांत निवडणूक आयोगातील रिक्त झालेल्या जागांवर नियुक्त्या करणार का, अशी विचारणा होत आहे. 

सरकारी सूत्रांनी सांगितले की, निवडणूक आयोग घटनात्मकदृष्ट्या एक सदस्यीय मंडळाच्या रूपात काम करू शकतो. त्यामुळे सध्या कुठलंही घटनात्मक संकट उभं राहिलेलं नाही. २०१५ मध्ये नसीम झैदी हे मुख्य निवडणूक आयुक्त बनल्यावर निवडणूक आयोगाने एक महिन्यापेक्षा अधिक काळ एक सदस्यीय मंडळाच्या रूपात काम केलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली होती.

२०२० मध्ये अशोक लवासा यांनी आयोगामधील मतभेदानंतर निवडणूक आयुक्तपद सोडलं होतं. अरुण गोयल यांचा निवडणूक आयोगामधील कार्यकाळ हा २०२७ पर्यंत होता. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या निवृत्तीनंतर २०२५ मध्ये ते मुख्य निवडणूक आयुक्त बनले असते. याआधी ते केंद्र सरकारमध्ये सचिव पदावर कार्यरत होते. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली होती. त्यानंतर त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र त्यांच्याविरोधातील याचिता फेटाळून लावल्या गेल्या होत्या.

केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळ अधिवेशनात निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत एक कायदा पारित केला होता. त्यानुसार पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि एक केंद्रीय मंत्री नियुक्तीबाबत निर्णय घेणार आहेत. या कायद्यानुसार पहिली बैठक आता होणार आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४