शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:33 IST

प्रत्येक राज्यातील रिक्त राज्यसभेच्या जागांची संख्या आणि आमदारांची संख्या यावर एका उमेदवाराला जिंकण्यासाठी किती मतांची गरज असते ते ठरते

नवी दिल्ली - राज्यसभेच्या ८ जागांसाठी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. तामिळनाडू ६ आणि आसामध्ये २ जागा जून, जुलैमध्ये रिक्त होत आहे. ज्यासाठी १९ जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी केली जाईल. राज्यसभा निवडणुकीसाठी २ जूनला अधिसूचना जारी केली जाईल. ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दिली जाईल. राज्यसभा निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत. ही निवडणूक लोकसभा, विधानसभा, पंचायत अथवा इतर निवडणुकीपेक्षा वेगळी असते. 

राज्यसभेची मतदान प्रक्रिया आणि मतमोजणीचे गणित वेगळे असते. प्रत्येक राज्यातील रिक्त राज्यसभेच्या जागांची संख्या आणि आमदारांची संख्या यावर एका उमेदवाराला जिंकण्यासाठी किती मतांची गरज असते ते ठरते. तामिळनाडूबाबत बोलायचे झाले तर एका उमेदवाराला जिंकण्यासाठी ३४ मतांची गरज आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण २३५ जागा आहेत आणि २३४ आमदार आहेत. या राज्यात सत्ताधारी द्रविड मुनेत्र काषगम पक्षाकडे १३३ आमदार आहेत. काँग्रेसकडे १७, वीसीकेकडे ४ आणि डाव्या पक्षांकडे ४ आमदार आहेत. विरोधी पक्ष एआयडिएमकेकडे ६६ आमदारांसह भाजपाचे ४ आमदार आहेत. 

तामिळनाडूत ६ राज्यसभेच्या जागांपैकी ३ डिएमकेकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ३४ मतांची गरज आहे. डिएमके आणि त्यांच्या मित्रपक्षाकडे एकूण १५८ मते आहेत. त्यामुळे ४ जागांवर त्यांचा विजय पक्का आहे. एआयडिएमके एका जागेवर सहज विजयी होईल परंतु दुसऱ्या जागेसाठी त्यांना भाजपाच्या ४ मतांची गरज आहे. त्यामुळे एका जागेवर तामिळनाडू भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे मात्र AIDMK सोबत त्यांच्या संबंधामुळे त्यांचा राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग सोपा नाही.

आसाममधील दोन्ही जागा भाजपा जिंकणार?

आता आसामबाबत बोलाल तर इथं विधानसभेच्या एकूण १२६ जागा आहेत. ज्यात भाजपाकडे ६४ आणि सहकारी पक्षाकडे १६ जागा आहेत. त्यामुळे भाजपा आघाडीचं संख्याबळ ८० इतके आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४३ मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपाचा एका जागेवर विजय निश्चित आहे परंतु दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांना २२ मतांची गरज आहे. जर भाजपाच्या मित्रपक्षांचा १६ आकडा पकडला तरी ३६ मते त्यांच्याकडे आहेत. त्यांना ६ अतिरिक्त मतांची गरज भासेल. दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसकडे २६, सीपीआय १, एआययूडिएफकडे १५ आणि बोडोलँडकडे ३ आमदार आहेत. जर या पक्षांनी काँग्रेसला साथ दिली तर त्यांचे संख्याबळ ४५ इतके होते. त्यामुळे राज्यसभेची दुसरी जागा ते जिंकू शकतात. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग