शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने बदलली पत्रकार परिषदेची वेळ, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 11:32 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेसाठी निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेची वेळ बदलल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेसाठी निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेची वेळ बदलल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या पत्रकार परिषदेच्या वेळात ऐनवेळी बदल करून ही पत्रकार परिषद दुपारी 3.30 वाजता होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. " या तीन बाबींकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे.  पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आज दुपारी 12.30 वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजमेर येथे सभा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेच्या वेळात अचानक बदल केला आहे."  निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे? असा सवाल सुरजेवाला यांनी या ट्विट्च्या माध्यमातून केला आहे.   केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली  आहे.  

टॅग्स :ElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस