शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 16:56 IST

Election 2024: 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना आपली जीव गमवावा लागला आहे.

Lok Sabha Elections 2024 Latest News : काल, म्हणजेच 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आली. एकीकडे संपूर्ण देशात एक्झिट पोलची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे अनेकांचा जीव जात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीव्र उष्णतेमुळे निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेल्या 33 कर्मचाऱ्यांसह किमान 58 लोकांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशात झाले आहेत. तिथे मिर्झापूर आणि सोनभद्र येथे निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या 15 कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी उष्माघाताने मृत्यू झाला. मिर्झापूरचे विभागीय आयुक्त मुथुकुमारसामी बी म्हणाले की, त्यापैकी तेरा जणांमध्ये सात होमगार्ड, तीन स्वच्छता कर्मचारी आणि एक लिपिक कर्मचारी यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितले की, मृतांमध्ये होमगार्ड, स्वच्छता कर्मचारी आणि इतर मतदान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण भर उन्हात दिवसभर मतदान प्रक्रियेदरम्यान कर्तव्यावर होते. ड्युटीवर मरण पावलेल्यांना 15 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रिनवा यांनी सांगितले.

बिहारमध्ये 14 जणांचा मृत्यू बिहारमध्येही निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या जवानांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. येथे एका दिवसात 14 लोकांचा मृत्यू झाला. बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने (डीएमडी) जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्वाधिक मृत्यू भोजपूरमध्ये झाले आहेत. तिथे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पाच कर्मचाऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यानंतर रोहतासमध्ये तीन, कैमूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

ओडिशात 9 अन् मध्य प्रदेशात 2 ठारओडिशातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले की, उष्णतेशी संबंधित आजारामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 54 झाली आहे. ओडिशात शुक्रवारी उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 45 होती. 54 मृत्यूंपैकी 20 पश्चिम ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यात आणि 15 संबलपूरमध्ये झाले. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त सत्यब्रत साहू यांनी सांगितले की, 15 मे पासून उष्णतेच्या लाटेमुळे 96 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातदेखील उष्णतेच्या लाटेमुळे दोन मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024VotingमतदानSun strokeउष्माघातHeat Strokeउष्माघात