शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

UP Election 2022: “मुस्लिम समाज आता आम्हाला मते देणार नाही, कारण आम्ही राम मंदिर बांधले, कलम ३७० हटवले”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 10:03 IST

UP Election 2022: पाकिस्तान आणि दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांची मते पक्षाला नकोच, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

लखनऊ: पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींकडे देशाचे लक्ष लागेल आहे. सर्वाधिक नजरा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांवर (UP Election 2022) असणार आहेत. सर्व पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपला सत्ता राखणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सर्वपक्षीय नेते वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. यातच आता भाजपच्या एका नेत्याने खळबळजनक विधान केले आहे. मुस्लिम समाज आता आम्हाला मते देणार नाही. कारण आम्ही राम मंदिर बांधले आणि अनुच्छेद ३७० हटवले, असा दावा करण्यात आला आहे. 

कन्नौज येथे एका जनसभेला संबोधित करताना भाजप खासदार सुब्रत पाठक यांनी मुस्लिम समाजाबाबत सदर विधान केले आहे. राम मंदिरांसारख्या मुद्द्यामुळे भाजपला मुस्लिम बांधवांची मते मिळणार नाहीत, असे पाठक म्हणाले. आम्ही १०० घरे बांधली तर, त्यातील ३० घरे मुस्लिम बांधवांचीही असतील. मात्र, असे असूनही आम्हाला मते देणार नाहीत. कारण चांगल्या गोष्टी केल्यात ते विसरून केवळ कलम ३७० रद्द केल्याचे लक्षात ठेवले जाते. याच कारणासाठी मते देणार नाही, असा दावा पाठक यांनी केला. 

दहशतवादाला समर्थन करणाऱ्यांची मते नकोच

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर बांधले जात आहे, काशी-विश्वनाथ कॉरिडोरचेही लोकार्पण करण्यात आले. आता मथुराची वेळ आली आहे. ज्यांना मते द्यायची आहेत, ते देतील. मात्र, भाजपला दहशतवादाचे समर्थन करणारे, पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणारे तसेच भारतात शरिया कायदा लागू करण्याची दिवास्वप्ने पाहणाऱ्यांची मते नकोच आहेत, असे पाठक यांनी ठामपणे सांगितले. 

दरम्यान, भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखेल असा अंदाज आहे. टाईम्स नाऊ आणि पोलस्ट्रेटच्या ओपिनियन पोलनुसार, पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल. भाजपला ४०३ पैकी २३९ ते २४५ जागा मिळू शकतील, असे सर्वेक्षण सांगते. तर समाजवादी पक्षाला ११९ ते १२५ जागा मिळतील असा अंदाज आहे. बहुजन समाज पक्ष ३० जागांसह तिसऱ्या, तर काँग्रेस ५ ते ८ जागांसह चौथ्या क्रमांकावर असेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ