शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

2019ची निवडणूक रेकॉर्डब्रेक जागांसह जिंकणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 04:53 IST

 पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली -  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. जनतेला भक्कम आणि निर्णयक्षम सरकार हवे आहे. जे चांगली कामगिरी करू शकेल, असेही त्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला ई मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी पुढील सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. तसेच मॉब लिंचिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रामाणिकपणे उद्योगधंदे चालवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचे आश्वासन मोदींनी दिले. सध्या आसाममध्ये पेटलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "असमान आणि हताश झालेल्या परस्परविरोधी पक्षांच्या समुह म्हणजे महाआघाडी नव्हे तर राजकीय उतावळेपणा आहे. पुढच्या निवडणुकीत आपल्या कामाचा मंच विकास, वेगवान विकास आणि सर्वांचा विकास हा असेल. तसेच आमच्या पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा निश्चितपणे अधिका जागा मिळतील. आम्ही याआधीचा विक्रम मोडीत काढू, असा मला विश्वास आहे." यावेळी मोदींनी एनआरसीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकास्र सोडले. आसाममधील एनआरसीच्या मुद्द्यावरून मतांचे राजकारण सुरू आहे. 1972 आणि 1982 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना एनआरसीची अंमलबजावणी टाळले गेले होते." असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण