शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

UP ELECTION 2017 - उत्तरप्रदेशात 'कमळ' फुलणार - राजदीप सरदेसाई

By admin | Published: March 03, 2017 11:32 AM

दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीचा विचार करता उत्तरप्रदेश जिंकणे भाजपासाठी महत्वाचे असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 3 - राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला अनुकूल निकाल लागतील असा अंदाज राजकीय विश्लेषक आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीचा विचार करता उत्तरप्रदेश जिंकणे भाजपासाठी महत्वाचे असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे. 
 
2014 लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला उत्तरप्रदेशात एकूण 42 टक्के मते मिळाली आणि राज्यातील 80 पैकी तब्बल 73 जागांवर भाजपा खासदार विजयी झाले. त्यावेळी मोदी लाट होती. यंदाच्या विधानसभेत त्या मतांमध्ये 10 टक्क्यांची घट गृहित धरली तरी, भाजपासाठी सहज सत्तेचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. कारण 2012 मध्ये 29 टक्के मते मिळवून उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत आला. त्यापूर्वी 2007 मध्ये बसपाने 30 टक्के मते मिळवून राज्याची सत्ता मिळवली होती असे राजदीप यांनी म्हटले आहे. 
 
काही विश्लेषक काँग्रेस-समाजवादी पक्षाची आघाडी झाल्यामुळे 2015 बिहार विधानसभेच्या निवडणुकीशी तुलना करत आहेत. त्यावेळी बिहारमध्ये भाजपा विरोधात महागठबंधन झाल्यामुळे भाजपाला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. पण उत्तरप्रदेशात तिरंगी लढत आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि बसपा अखिलेश स्वतंत्र लढत आहेत. नितीश कुमार-लालू प्रसाद यादव यांच्याप्रमाणे त्यांच्यात आघाडी झालेली नाही. उत्तरप्रदेशात काँग्रेसकडे कमकुवत पक्ष म्हणून पाहिले जाते असे निरीक्षण राजदीप यांनी नोंदवले आहे. 
 
उत्तरप्रदेशात विरोधक मोदींना 'आऊटसाईडर' ठरवत असले तरी, मोदींबद्दल एक विश्वास आहे. मोदींनी दत्तक घेतलेल्या वाराणासीतील जयापूर गावात रस्त्यांची दुरावस्था आहे. सोलार पॅनलच्या बॅटरींची चोरी झालीय, टॉयलेटमध्ये पाण्याची व्यवस्था नाही तरीही इथले मतदार मोदींना मतदान करणार असे म्हणतात. नोटाबंदीची झळ सोसावी लागले हे इथल्या लोकांना मान्य असले तरी, ते मोदींना साथ देण्याचा त्यांचा सूर आहे असे राजदीप यांचे निरीक्षण आहे.