शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:16 IST

दीर्घ काळ न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाच्या खटल्यावर लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्या अशी याचिका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.

नवी दिल्ली - मागील ३ वर्षापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे या खटल्याची अंतिम सुनावणी ८ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादावर १९ ऑगस्टपासून सुनावणी सुरू होणार आहे. त्यानंतर शिवसेना कुणाची या वादाचा फैसला ऑक्टोबर महिन्यात येणार आहे. संगणक प्रणालीत ८ ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट या वादावर निर्णय देणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाकडे मागितलेल्या सल्ल्याला उत्तर देण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात न्यायाधीश सूर्यकांत यांचाही समावेश आहे. न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे. त्यामुळे शिवसेना खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार आहे. त्यात दिवाळीच्या नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील असं बोलले जात आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कुणाची हा फैसला सुप्रीम कोर्ट देणार आहे. 

मागील सुनावणीत काय घडलं?

दीर्घ काळ न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाच्या खटल्यावर लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्या अशी याचिका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यावर १४ जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी करताना न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील असं सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असं स्पष्ट केले होते. मात्र राष्ट्रपती-राज्यपाल वादातील खटल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली. या प्रकरणाला २ वर्ष झाली असून त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असे संकेतच सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत दिले होते. 

उद्धव ठाकरेंचं सरन्यायाधीशांना साकडे

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि नाव यासंदर्भातील याचिकेवरून थेट देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना साकडे घातले. हा खटला न्यायालयात दाखल झाल्यापासून आपण चौथे सरन्यायाधीश आहात. लोकशाहीच्या तोंडात न्यायाचे पाणी जर नाही घातले तर देशाची लोकशाही मरेल. त्यामुळे आपण त्यात लक्ष घाला ही मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो आहे. आपल्या न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडते आहे. तीन ते चार वर्षे झाली ती कधी प्राण सोडेल माहीत नाही असं ठाकरेंनी म्हटलं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे