शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 18:22 IST

रेबिया प्रकरणाच्या निकालातील बारकावे आणि महाराष्ट्रातील हे प्रकरण कसे वेगळे आहे हे आम्ही कोर्टासमोर मांडले आहे असं ठाकरे गटाने सांगितले.

नवी दिल्ली - शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्र याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली. गेल्या ६ महिन्यापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे प्रलंबित आहे. सध्या ५ न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी घेत आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवी, महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडत आहेत. आज झालेल्या सुनावणीत शिंदे-ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर उद्या पुन्हा यावर सुनावणी होणार आहे. 

आज कोर्टात काय झाले याबाबत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, अरुणाचलच्या नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला शिंदे गटाकडून सातत्याने कोर्टात दिला जातोय. त्या निकालात असलेल्या उणीवा, त्या आणि आजच्या केसमधील फरक याबाबत कोर्टात आमच्या बाजूने युक्तिवाद मांडला. रेबिया प्रकरण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी लागू होत नाही हे कोर्टात आम्ही पटवून दिले. याचे विश्लेषण वकिलांनी व्यवस्थितपणे कोर्टात केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज अत्यंत महत्त्वाची सुनावणी झाली. जर १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर त्याचा विधानसभेच्या संख्याबळावर किती परिणाम होईल. बैठकीला गैरहजर राहणे, स्वच्छेने पक्षाविरोधात वागणे म्हणजे स्वत:हून पक्ष सोडून देणे असं होते. कायद्याच्या दृष्टीने जे विश्लेषण करायचं होतं ते आमच्या वकिलांनी छान प्रकारे केले. रेबिया प्रकरणाच्या निकालातील बारकावे आणि महाराष्ट्रातील हे प्रकरण कसे वेगळे आहे हे आम्ही कोर्टासमोर मांडले आहे. आता याबाबत उद्या शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद मांडला जाईल अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली. दरम्यान, सुप्रीम कोर्टासमोर प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण करावं लागते. राज्यपालांचा मुद्दा यावर सुनावणीतून चर्चा झाली नाही. तत्वनिष्ठ बाजू मांडल्यानंतर सर्वोच्च न्यायालय याबाबत निर्णय घेईल असं अनिल देसाईंनी सांगितले. 

काय मांडला युक्तिवाद? 

  • नबाम रेबिया प्रकरणात उपाध्यक्षांचा आणि राज्यपालांचा निर्णय कोर्टाने रद्द केला होता. 
  • अनेक आमदारांच्या पक्षांतरामुळे नवीन सरकार स्थापन करावं लागलं.
  • राजकीय सभ्यता कायम राहण्यासाठी घटनेची दहावी सूची दिली आहे. या दहाव्या सूचीचा गैरवापर होतोय की काय अशी शंका उपस्थित होतेय. 
  • सध्या अनेक सदस्यांविरोधात अपात्रतेची कारवाई होत आहे. सभागृह सुरू असतानाच अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला जावा. तसं न झाल्यास लोक मनाप्रमाणे सरकार पाडतील. 
  • म्हणूनच सभागृह सुरू असताना नोटीस आणि पुढील ७ दिवसांत निवाडा व्हावा
  • अधिवेशन सुरू नसताना उपाध्यक्षांना अविश्वासाची नोटीस देण्यात आली. 
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे