शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; सलग दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीत कोर्टात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:40 IST

शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद मांडला. हरिश साळवे यांनी ४५ मिनिटे युक्तिवाद केला.

नवी दिल्ली - सत्तासंघर्षाबद्दल सलग २ दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मंगळवारच्या सुनावणी ठाकरे गटाकडून युक्तिवाद मांडण्यात आला होता. त्यानंतर बुधवारच्या सुनावणी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. परंतु उद्या पुन्हा यावर सुनावणी होणार आहे.

याबाबत अनिल देसाई म्हणाले की, शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद मांडला. हरिश साळवे यांनी ४५ मिनिटे युक्तिवाद केला. नबाम रेबिया खटल्याचा निकाल ती या प्रकरणाला लागू करावी अशाप्रकारे शिंदे गटाकडून युक्तिवाद मांडला गेला. राज्यपालांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. प्रत्येक सदस्यांचे हक्क आणि अधिकार यांच्याबाबत चर्चा झाली. आजच्या युक्तिवादात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एकमेकांशी चर्चाविनिमय करत होते. रेबिया प्रकरणाचा निकाल आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष यात विविध प्रकारचे मुद्दे आहे. हे दोन्ही प्रकरण वेगळे असल्याचं आम्ही सांगितले अशी माहिती त्यांनी दिली. 

त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि ही परिस्थिती उद्भवली असं नाही. पक्षविरोधी कारवाई केल्यानंतर १६ आमदारांना पहिली अपात्रतेची नोटीस दिली. त्या अध्यक्षांचे अधिकार वापरण्यास का मिळाले नाहीत अशाप्रकारे युक्तिवाद मांडला गेला. सदस्यांचे संख्याबळ कमी करणे आणि पाहिजे ते निर्णय घेणे अशाप्रकारे चित्र रंगवून युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यावेळची परिस्थिती तशी होती. २१ जूनला आमदार सूरतला निघून गेले होते. त्यानंतर पक्षाने बोलावलेल्या विधिमंडळ बैठकीस आमदार गैरहजर होते. त्यामुळे पक्षविरोधी कारवाई करून या आमदारांनी स्वइच्छेने पक्ष सोडल्याचं सिद्ध होते यावरून ते निलंबनासाठी पात्र झाले आहेत असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून कोर्टात करण्यात आला. 

दरम्यान, वकिलांनी युक्तिवाद करताना समोरच्याचा हेतू काय याबाजूने युक्तिवाद करणे हा किती पोकळ असतो तो कोर्टासमोर निदर्शनास आलेले आहे. रेबिया खटल्याची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्राचं प्रकरण गुंतागुंतीचे आहे. याचा परिणाम देशातील लोकशाहीवर होऊ शकतो. त्यामुळे सुप्रीम कोर्ट हा सगळा विचार करून निर्णय घेईल. सुरुवातीला ३ न्यायमूर्तीसमोर हे प्रकरण आले. त्यानंतर ५ न्यायामूर्तींसमोर आले. रेबिया प्रकरणातील काही त्रुटी आम्ही कोर्टासमोर मांडल्या आहेत. ज्यावेळी अशाप्रकारे गुंतागुंतीचे प्रकरण होते तेव्हा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे मांडावे अशी आम्ही मागणी केलीय. ७ जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण जावं अशी मागणी केलीय त्यावर उद्या सुनावणी पूर्ण होईल असा विश्वास ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब यांनी मांडला.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय