शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-ठाकरे वादात बृजभूषण सिंह यांची उडी; शिवसेना अन् उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 15:38 IST

भाजपाच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेसचा हात तुम्ही पकडला. आमच्या कार्यकर्त्यांची साथ घेतली आणि सत्तेसाठी तुम्ही कुठे गेला? असा सवाल बृजभूषण सिंह यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं आहे.

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तानाट्याची देशभरात चर्चा आहे. आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेलेल्या तब्बल ५१ आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला धोक्यात आणलं आहे. 

या सर्व राजकीय घडामोडीत मनसैनिकांना चोपण्याची भाषा करणारे, राज ठाकरेंना उंदीर म्हणणारे मनसेच्या अयोध्या दौऱ्यात मिठाचा खडा टाकणारे आता हेच बृजभूषण पुन्हा एकदा मैदानात आलेत, बृजभूषण सिंह यांनी ठाकरे-शिंदे वादात उडी घेत थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जाहीर व्यासपीठावरून बृजभूषण सिंह यांनी उद्धव ठाकरेंना भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून देत आहेत. 

बृजभूषण सिंह म्हणाले की, शिवसैनिक तोडफोड करत आहेत. पक्षाच्या नावावर लढून गेला म्हणून बंडखोरीचा अधिकार नाही असं शिंदे गटाला सांगतायेत. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी तुमच्याशी बंडखोरी केली तर दु:ख होत आहे. परंतु भाजपासोबत मिळून निवडणूक लढवली. छोटा भाऊ म्हणून निवडणूक लढवली. जागा जास्त लढवल्या. भाजपाच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेसचा हात तुम्ही पकडला. आमच्या कार्यकर्त्यांची साथ घेतली आणि सत्तेसाठी तुम्ही कुठे गेला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच बाळासाहेब ठाकरेंचा जो नारा होता त्याच्याविरोधात गेले. जे भाजपासोबत उद्धव ठाकरेंनी केले तेच शिवसैनिक त्यांच्यासोबत करत आहेत. बृजभूषण सिंह यांच्याशी पंगा घेतला आणि ठाकरे कुटुंबाचं अस्तित्व संपत आले आहे. लवकरात लवकर पंतप्रधान मोदी यांच्याकडे शरण या अन्यथा अस्तित्व उरणार नाही असा इशाराही बृजभूषण सिंह यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. 

संजय राऊतांनी केले होते कौतुकमनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यामुळे बृजभूषण सिंह चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बृजभूषण यांचं कौतुक करताना म्हटलं होतं की, बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले. आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं अशा शब्दात राऊतांनी त्यांचे कौतुक केले होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाBJPभाजपा