शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

शिंदे-ठाकरे वादात बृजभूषण सिंह यांची उडी; शिवसेना अन् उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 15:38 IST

भाजपाच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेसचा हात तुम्ही पकडला. आमच्या कार्यकर्त्यांची साथ घेतली आणि सत्तेसाठी तुम्ही कुठे गेला? असा सवाल बृजभूषण सिंह यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं आहे.

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तानाट्याची देशभरात चर्चा आहे. आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेलेल्या तब्बल ५१ आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला धोक्यात आणलं आहे. 

या सर्व राजकीय घडामोडीत मनसैनिकांना चोपण्याची भाषा करणारे, राज ठाकरेंना उंदीर म्हणणारे मनसेच्या अयोध्या दौऱ्यात मिठाचा खडा टाकणारे आता हेच बृजभूषण पुन्हा एकदा मैदानात आलेत, बृजभूषण सिंह यांनी ठाकरे-शिंदे वादात उडी घेत थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जाहीर व्यासपीठावरून बृजभूषण सिंह यांनी उद्धव ठाकरेंना भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून देत आहेत. 

बृजभूषण सिंह म्हणाले की, शिवसैनिक तोडफोड करत आहेत. पक्षाच्या नावावर लढून गेला म्हणून बंडखोरीचा अधिकार नाही असं शिंदे गटाला सांगतायेत. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी तुमच्याशी बंडखोरी केली तर दु:ख होत आहे. परंतु भाजपासोबत मिळून निवडणूक लढवली. छोटा भाऊ म्हणून निवडणूक लढवली. जागा जास्त लढवल्या. भाजपाच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेसचा हात तुम्ही पकडला. आमच्या कार्यकर्त्यांची साथ घेतली आणि सत्तेसाठी तुम्ही कुठे गेला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच बाळासाहेब ठाकरेंचा जो नारा होता त्याच्याविरोधात गेले. जे भाजपासोबत उद्धव ठाकरेंनी केले तेच शिवसैनिक त्यांच्यासोबत करत आहेत. बृजभूषण सिंह यांच्याशी पंगा घेतला आणि ठाकरे कुटुंबाचं अस्तित्व संपत आले आहे. लवकरात लवकर पंतप्रधान मोदी यांच्याकडे शरण या अन्यथा अस्तित्व उरणार नाही असा इशाराही बृजभूषण सिंह यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. 

संजय राऊतांनी केले होते कौतुकमनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यामुळे बृजभूषण सिंह चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बृजभूषण यांचं कौतुक करताना म्हटलं होतं की, बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले. आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं अशा शब्दात राऊतांनी त्यांचे कौतुक केले होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाBJPभाजपा