शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:43 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील महागड्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, असे ते म्हणाले. 

देशात प्रचंड महागलेले शिक्षण आणि खर्चिक आरोग्य सुविधा याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे.  चांगल्या आरोग्य सुविधा स्वस्तात आणि सहज मिळायला हव्यात, असे म्हणत सरसंघचालक भागवत यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हे भाष्य केले. 

"सगळ्यांना सर्वात जास्त गरज असते ती, आरोग्य आणि शिक्षणाची. पण, दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की, या दोन्हीही गोष्टी आज सर्वसामान्य माणसापासून दूर आहेत आणि आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत", असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.  

 "समाजाला आज अशा आरोग्य सुविधा हव्यात आहेत ज्या सहजपणे आणि स्वस्तात मिळतील. त्यासाठी अधिक जागा हव्या. बाजारीकरणामुळे केंद्रीकरणही होत आहे", अशी भूमिका त्यांनी मांडली. 

कुटुंब चिंतेत असते की पुढे काय होईल -भागवत

"चांगले उपचार हवे असतील, तर लोकांना शहरांमध्ये जावं लागतं. कर्करोगावर उपचार होतात, असे भारतात आठ-दहाच शहरे आहेत. तिथे लोकांना जावं लागतं. तिथे उपचारांचा खर्च वेगळा असतो. तिथे येण्या-जाण्याचे खर्च वेगळा असतो. तिथ राहायचा खर्च असतो. कुटुंब चिंतेत असते की, पुढे काय होईल. एकाच वेळी या सगळ्या गोष्टी होत असतात", असे सरसंघचालक भागवत म्हणाले.   

"आपण बघतो की, माणूस आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घरही विकतो, पण तो चांगले शिक्षण देतो. चांगल्या ठिकाणी उपचार घेता यावेत म्हणूनही घर विकतो आणि त्याची व्यवस्था करतो", असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्यEducationशिक्षण