शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:43 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील महागड्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, असे ते म्हणाले. 

देशात प्रचंड महागलेले शिक्षण आणि खर्चिक आरोग्य सुविधा याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे.  चांगल्या आरोग्य सुविधा स्वस्तात आणि सहज मिळायला हव्यात, असे म्हणत सरसंघचालक भागवत यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हे भाष्य केले. 

"सगळ्यांना सर्वात जास्त गरज असते ती, आरोग्य आणि शिक्षणाची. पण, दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की, या दोन्हीही गोष्टी आज सर्वसामान्य माणसापासून दूर आहेत आणि आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत", असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.  

 "समाजाला आज अशा आरोग्य सुविधा हव्यात आहेत ज्या सहजपणे आणि स्वस्तात मिळतील. त्यासाठी अधिक जागा हव्या. बाजारीकरणामुळे केंद्रीकरणही होत आहे", अशी भूमिका त्यांनी मांडली. 

कुटुंब चिंतेत असते की पुढे काय होईल -भागवत

"चांगले उपचार हवे असतील, तर लोकांना शहरांमध्ये जावं लागतं. कर्करोगावर उपचार होतात, असे भारतात आठ-दहाच शहरे आहेत. तिथे लोकांना जावं लागतं. तिथे उपचारांचा खर्च वेगळा असतो. तिथे येण्या-जाण्याचे खर्च वेगळा असतो. तिथ राहायचा खर्च असतो. कुटुंब चिंतेत असते की, पुढे काय होईल. एकाच वेळी या सगळ्या गोष्टी होत असतात", असे सरसंघचालक भागवत म्हणाले.   

"आपण बघतो की, माणूस आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घरही विकतो, पण तो चांगले शिक्षण देतो. चांगल्या ठिकाणी उपचार घेता यावेत म्हणूनही घर विकतो आणि त्याची व्यवस्था करतो", असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्यEducationशिक्षण