शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ED ला मला अटक करायचीय, मी बाहेर राहिलो तर...; संजय राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 10:35 IST

या देशातील ड्रग्स रॅकेट, हवाला रॅकेट, भ्रष्टाचार यावर कारवाई करण्यासाठी ईडीचे अधिकार आहे. परंतु त्याचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांवर केला जात आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

नवी दिल्ली - अर्जुन खोतकर यांच्या प्रामाणिकपणाला मी दाद देतो. खोतकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर दडपण आहे. या संकटाच्या काळात कोणताही माणूस सुटकेचा मार्ग शोधतो. त्यांच्यावर कुणाचा दबाव आणि तणाव आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. खोतकरांनी हिंदुत्वाला बदनाम केले नाही. उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका केली नाही असं सांगत अर्जुन खोतकर यांच्या भूमिकेला संजय राऊतांनी समर्थन दिले. 

ईडीच्या कारवाईबाबत संजय राऊत म्हणाले की, माझ्यासारख्या अनेकांना ईडीला अटक करायची असेल. संजय राऊत शिवसेनेच्या भूमिकेला देशभरात नेत आहेत. राऊत बाहेर राहिले तर सरकारला अडचणीचे ठरेल. निवडणुकीत भाजपाला जड जाईल. यासाठी माझ्यावर कारवाई होणार असेल तर मी स्वीकारायला तयार आहे. मी गुडघे टेकणार नाही. मी कायदेशीर प्रक्रियेला विरोध केला नाही. मी संसदेत आहे त्यामुळे चौकशीसाठी वेळ मागून घेतला आहे. मी कुठल्याही कारवाईला सामोरे जायला तयार आहे. मला अटक करून शिवसेनेला बळ मिळणार असेल तर मी जेलमध्ये जायलाही तयार आहे. माझ्याआधीही अनेक शिवसैनिकांनी स्वत:चं बलिदान दिले आहे असं राऊतांनी सांगितले. 

तसेच या देशातील ड्रग्स रॅकेट, हवाला रॅकेट, भ्रष्टाचार यावर कारवाई करण्यासाठी ईडीचे अधिकार आहे. परंतु त्याचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांवर केला जात आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. विरोधी पक्षातील प्रमुख लोकांवर ईडीची कारवाई होत आहे. कोणी भ्रष्ट मार्गाने पैसे कमवत असेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सत्ताधारी पक्षातील सर्व धुतळ्या तांदळाचे आहेत का? असा आमचा प्रश्न आहे असंही संजय राऊत म्हणाले. 

आमदारांना दुसऱ्या पक्षात गेल्याशिवाय पर्याय नाहीकोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयात संविधानाविरोधात न्यायमूर्ती निकाल देणार नाही याची खात्री असल्याने १६ आमदार १० व्या शेड्युल्डनुसार अपात्र ठरतील हे नक्की आहे. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला राऊतांनी शिंदे गटातील शिवसेना आमदारांना लगावला. 

तसेच दुसऱ्या पक्षात जायला किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची कल्पना आम्हाला आहे. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झाले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. शिवसेना सर्व निवडणुका लढवणार आहे. भाजपाला शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं कारस्थान भाजपाचं होतं. त्यात जे यश त्यांना आले हे दिर्घकाळ टिकणार नाही असंही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय