शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

भाजपा पदाधिकाऱ्याशी वाद, ED चं २ शेतकऱ्यांना समन्स; राजकारण पेटलं, पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 11:21 IST

परंतु हा वाद ५ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांना जारी केलेल्या ईडी समन्समुळे उभा राहिला.

नवी दिल्ली - ED Summons to Farmers ( Marathi News ) ईडीच्या कारवायांवरून विरोधक सातत्याने सत्ताधारी भाजपावर निशाणा साधतात. सत्तेचा दुरुपयोग करून भाजपा विरोधकांच्या मागे ईडी लावते असा आरोप केला जातो. त्यातच आता तामिळनाडूत असे प्रकरण समोर आलंय ज्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील अट्टूर येथील २ शेतकऱ्यांना ईडीने समन्स पाठवले आहे. ज्यात तपास यंत्रणेने त्यांच्या जीताचा उल्लेख केल्याचाही आरोप आहे. हे प्रकरण सेलम जिल्ह्यातील अट्टूरमध्ये राहणारे दोन भाऊ कन्नैयन आणि कृष्णन यांच्याशी निगडीत आहे. 

काय आहे प्रकरण?एस कन्नैयन आणि त्यांचा भाऊ कृष्णन यांनी त्यांच्या शेताच्या चारीबाजूला बेकायदेशीर वीजेचे कुंपण घातले आहे. त्यामुळे २ भारतीय जंगली गव्यांचा मृत्यू झाला होता. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत त्या दोघांविरोधात २०१७ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.त्यानंतर कोर्टात या प्रकरणी २८ डिसेंबर २०२१ ला शेतकरी कृष्णन आणि कन्नैयन या दोघांना निर्दोष सोडले. परंतु या घटनेनंतर FIR चा आढावा घेत ईडीने तामिळनाडू वनविभागाच्या एका पत्राच्या आधारे मार्च २०२२ मध्ये या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली.

परंतु हा वाद ५ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांना जारी केलेल्या ईडी समन्समुळे उभा राहिला. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडूतील राजकीय पक्ष आणि समाजसेवकांनी ईडीने या दोन शेतकऱ्यांना समन्स पाठवले आहे. त्यात दोघांच्या जातीचा उल्लेख केला आहे त्यावर आक्षेप घेत विरोध केला आहे. या शेतकऱ्यांच्या वकिलाने दावा केलाय की, ईडीची ही कारवाई शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. कारण हे दोन शेतकरी स्थानिक भाजपा नेते गुनासेकरन यांच्याशी कायदेशीर लढा देत आहेत. वकिलांनी केवळ ईडीच्या हेतूवर संशय घेतला नाही तर त्यांनी पाठवलेल्या समन्सवर नाराजी व्यक्त करत ईडी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. 

काय आहे आरोप?कृष्णन यांनी सांगितले की, हे प्रकरण जमिनीचे खरे मालक आणि बनावट दस्तावेज यात आहे. गुनासेकरन यांच्याविरोधात कोर्टात अर्ज दाखल केला होता. आम्ही २०२० पासून यात कायदेशीर लढा देत आहोत. ईडीने आमच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली. गेल्या ४ वर्षापासून आम्ही शेती केली नाही. आमच्या बँक खात्यात केवळ ४५० रुपये आहेत. सरकारकडून वृद्ध व्यक्तींना देण्यात येणारे प्रतिमाह १ हजार रुपये आणि मोफत रेशन यावर आमचा उदर निर्वाह सुरू आहे. आमच्या जमिनीवर गुनासेकरन यांनी अवैध कब्जा केला आहे. 

दरम्यान या प्रकरणी एका आयआरएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांना पत्र पाठवून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेत्याशी कायदेशीर वादानंतर ईडीने सेलम जिल्ह्यातील २ गरीब शेतकऱ्यांना समन्स पाठवले. ७२ वर्षीय कन्नैयन आणि ६७ वर्षीय कृष्णन यांच्याकडे तामिळनाडूच्या अट्टर इथं साडे सहा एकर जमीन आहे. या जमिनीवरून भाजपाचे माजी जिल्हा सचिव गुनासेकरन यांच्याशी वाद सुरू आहे. या वादामुळे गेल्या ४ वर्षापासून या शेतकऱ्यांना शेती करता आली नाही. गुनासेकरन यांच्याविरोधात कृष्णन यांनी २०२० मध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यात त्यांना अटक होऊन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा