शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पदाधिकाऱ्याशी वाद, ED चं २ शेतकऱ्यांना समन्स; राजकारण पेटलं, पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 11:21 IST

परंतु हा वाद ५ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांना जारी केलेल्या ईडी समन्समुळे उभा राहिला.

नवी दिल्ली - ED Summons to Farmers ( Marathi News ) ईडीच्या कारवायांवरून विरोधक सातत्याने सत्ताधारी भाजपावर निशाणा साधतात. सत्तेचा दुरुपयोग करून भाजपा विरोधकांच्या मागे ईडी लावते असा आरोप केला जातो. त्यातच आता तामिळनाडूत असे प्रकरण समोर आलंय ज्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील अट्टूर येथील २ शेतकऱ्यांना ईडीने समन्स पाठवले आहे. ज्यात तपास यंत्रणेने त्यांच्या जीताचा उल्लेख केल्याचाही आरोप आहे. हे प्रकरण सेलम जिल्ह्यातील अट्टूरमध्ये राहणारे दोन भाऊ कन्नैयन आणि कृष्णन यांच्याशी निगडीत आहे. 

काय आहे प्रकरण?एस कन्नैयन आणि त्यांचा भाऊ कृष्णन यांनी त्यांच्या शेताच्या चारीबाजूला बेकायदेशीर वीजेचे कुंपण घातले आहे. त्यामुळे २ भारतीय जंगली गव्यांचा मृत्यू झाला होता. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत त्या दोघांविरोधात २०१७ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.त्यानंतर कोर्टात या प्रकरणी २८ डिसेंबर २०२१ ला शेतकरी कृष्णन आणि कन्नैयन या दोघांना निर्दोष सोडले. परंतु या घटनेनंतर FIR चा आढावा घेत ईडीने तामिळनाडू वनविभागाच्या एका पत्राच्या आधारे मार्च २०२२ मध्ये या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली.

परंतु हा वाद ५ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांना जारी केलेल्या ईडी समन्समुळे उभा राहिला. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडूतील राजकीय पक्ष आणि समाजसेवकांनी ईडीने या दोन शेतकऱ्यांना समन्स पाठवले आहे. त्यात दोघांच्या जातीचा उल्लेख केला आहे त्यावर आक्षेप घेत विरोध केला आहे. या शेतकऱ्यांच्या वकिलाने दावा केलाय की, ईडीची ही कारवाई शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. कारण हे दोन शेतकरी स्थानिक भाजपा नेते गुनासेकरन यांच्याशी कायदेशीर लढा देत आहेत. वकिलांनी केवळ ईडीच्या हेतूवर संशय घेतला नाही तर त्यांनी पाठवलेल्या समन्सवर नाराजी व्यक्त करत ईडी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. 

काय आहे आरोप?कृष्णन यांनी सांगितले की, हे प्रकरण जमिनीचे खरे मालक आणि बनावट दस्तावेज यात आहे. गुनासेकरन यांच्याविरोधात कोर्टात अर्ज दाखल केला होता. आम्ही २०२० पासून यात कायदेशीर लढा देत आहोत. ईडीने आमच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली. गेल्या ४ वर्षापासून आम्ही शेती केली नाही. आमच्या बँक खात्यात केवळ ४५० रुपये आहेत. सरकारकडून वृद्ध व्यक्तींना देण्यात येणारे प्रतिमाह १ हजार रुपये आणि मोफत रेशन यावर आमचा उदर निर्वाह सुरू आहे. आमच्या जमिनीवर गुनासेकरन यांनी अवैध कब्जा केला आहे. 

दरम्यान या प्रकरणी एका आयआरएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांना पत्र पाठवून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेत्याशी कायदेशीर वादानंतर ईडीने सेलम जिल्ह्यातील २ गरीब शेतकऱ्यांना समन्स पाठवले. ७२ वर्षीय कन्नैयन आणि ६७ वर्षीय कृष्णन यांच्याकडे तामिळनाडूच्या अट्टर इथं साडे सहा एकर जमीन आहे. या जमिनीवरून भाजपाचे माजी जिल्हा सचिव गुनासेकरन यांच्याशी वाद सुरू आहे. या वादामुळे गेल्या ४ वर्षापासून या शेतकऱ्यांना शेती करता आली नाही. गुनासेकरन यांच्याविरोधात कृष्णन यांनी २०२० मध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यात त्यांना अटक होऊन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा