शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडी’ची नुसतीच ‘काडी’!, १५ वर्षांत केवळ १४ प्रकरणांतच दोषारोप सिद्ध करण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 06:41 IST

enforcement directorate : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) २००५ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर ‘ईडी’ला अमर्याद अधिकार प्राप्त झाले. त्यानंतर ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये वाढ झाली.

-  हरिश गुप्ता

नवी दिल्ली : एखाद्याच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून दिले की, त्याची पळता भुई थोडे होते. त्यात हे चौकशीचे शुक्लकाष्ठ ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे असेल तर मग काही बघायलाच नको... ‘ईडी’चा दरारा एवढा मोठा की, चौकशीसाठी बोलावणे आले की, समोरच्याच्या उरात धडकी भरते. असे असले तरी गेल्या १५ वर्षांत ‘ईडी’ ला केवळ १४ प्रकरणांतच आरोप सिद्ध करून दाखविण्यात यश आले आहे. तशी आकडेवारीच ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) २००५ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर ‘ईडी’ला अमर्याद अधिकार प्राप्त झाले. त्यानंतर ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये वाढ झाली. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा, माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, भूपिंदरसिंह हुड्डा, अगुस्टावेस्टलँड, डी. के. शिवकुमार, व्हिडीओकॉन, आयसीआयसीआय, विजय मल्या, आयएनएक्स मीडिया, फारूक अब्दुल्ला, मेहुल चोक्सी इत्यादींना ‘ईडी’च्या चौकशीचा अनुभव आला आहे. अलीकडेच सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीमुळेही ‘ईडी’ चर्चेत होती. मात्र, असे असले तरी गेल्या १८ वर्षांतील आकडेवारी पाहता चौकशांच्या तुलनेत प्रकरण तडीस नेण्याच्या बाबतीत ‘ईडी’ कैक योजने दूर असल्याचे निष्पन्न होते. 

मोदी सरकारच्या कारकीर्दीत छाप्यांमध्ये वाढकाँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये उल्लेखनीय प्रमाणात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ‘ईडी’ने ९९ छापे टाकले होते. त्याचेच प्रमाण २०१९ मध्ये ६७० एवढे होते. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या काळात ‘ईडी’ केवळ नऊ प्रकरणांतच दोषारोप सिद्ध करू शकली आहे. 

अपुरा कर्मचारीवर्ग कारणीभूतदोषारोप सिद्ध करण्याच्या कामात ‘ईडी’ला येत असलेल्या अपयशाचे एक कारण म्हणजे अपुरे मनुष्यबळ होय. ‘ईडी’मध्ये २००० लोकांची भरती करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात सद्य:स्थितीत केवळ ११०० कर्मचारीच ‘ईडी’मध्ये आहेत. त्यामुळे या अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम तपासावर होतो. दरम्यान, ‘ईडी’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत ‘ईडी’चे माजी संचालक कर्नाल सिंग यांनी व्यक्त केले आहे.‘ईडी’ची ही अवस्था पाहून ‘बहुत शोर सुनते थे पहलूं मे दिल का, जो चिरा तो कतरा-ए-खून ना निकला’ या १९व्या शतकातील शायर ख्वाजा हैदर अली आतिश यांच्या कांव्यपक्ती आठवतात.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय