शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडी’ची नुसतीच ‘काडी’!, १५ वर्षांत केवळ १४ प्रकरणांतच दोषारोप सिद्ध करण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 06:41 IST

enforcement directorate : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) २००५ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर ‘ईडी’ला अमर्याद अधिकार प्राप्त झाले. त्यानंतर ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये वाढ झाली.

-  हरिश गुप्ता

नवी दिल्ली : एखाद्याच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून दिले की, त्याची पळता भुई थोडे होते. त्यात हे चौकशीचे शुक्लकाष्ठ ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे असेल तर मग काही बघायलाच नको... ‘ईडी’चा दरारा एवढा मोठा की, चौकशीसाठी बोलावणे आले की, समोरच्याच्या उरात धडकी भरते. असे असले तरी गेल्या १५ वर्षांत ‘ईडी’ ला केवळ १४ प्रकरणांतच आरोप सिद्ध करून दाखविण्यात यश आले आहे. तशी आकडेवारीच ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) २००५ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर ‘ईडी’ला अमर्याद अधिकार प्राप्त झाले. त्यानंतर ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये वाढ झाली. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा, माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, भूपिंदरसिंह हुड्डा, अगुस्टावेस्टलँड, डी. के. शिवकुमार, व्हिडीओकॉन, आयसीआयसीआय, विजय मल्या, आयएनएक्स मीडिया, फारूक अब्दुल्ला, मेहुल चोक्सी इत्यादींना ‘ईडी’च्या चौकशीचा अनुभव आला आहे. अलीकडेच सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीमुळेही ‘ईडी’ चर्चेत होती. मात्र, असे असले तरी गेल्या १८ वर्षांतील आकडेवारी पाहता चौकशांच्या तुलनेत प्रकरण तडीस नेण्याच्या बाबतीत ‘ईडी’ कैक योजने दूर असल्याचे निष्पन्न होते. 

मोदी सरकारच्या कारकीर्दीत छाप्यांमध्ये वाढकाँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये उल्लेखनीय प्रमाणात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ‘ईडी’ने ९९ छापे टाकले होते. त्याचेच प्रमाण २०१९ मध्ये ६७० एवढे होते. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या काळात ‘ईडी’ केवळ नऊ प्रकरणांतच दोषारोप सिद्ध करू शकली आहे. 

अपुरा कर्मचारीवर्ग कारणीभूतदोषारोप सिद्ध करण्याच्या कामात ‘ईडी’ला येत असलेल्या अपयशाचे एक कारण म्हणजे अपुरे मनुष्यबळ होय. ‘ईडी’मध्ये २००० लोकांची भरती करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात सद्य:स्थितीत केवळ ११०० कर्मचारीच ‘ईडी’मध्ये आहेत. त्यामुळे या अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम तपासावर होतो. दरम्यान, ‘ईडी’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत ‘ईडी’चे माजी संचालक कर्नाल सिंग यांनी व्यक्त केले आहे.‘ईडी’ची ही अवस्था पाहून ‘बहुत शोर सुनते थे पहलूं मे दिल का, जो चिरा तो कतरा-ए-खून ना निकला’ या १९व्या शतकातील शायर ख्वाजा हैदर अली आतिश यांच्या कांव्यपक्ती आठवतात.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय