शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

ईडीची मोठी कारवाई; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 12:33 IST

ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा ७० मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. 

मुंबई- ईडीकडून जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ऑगस्ट महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चाही यावेळी झाली होती. आता ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्संच्या विविध मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा ७० मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. 

ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि पक्षाचे खजिनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईचा संबंध शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वादाशी जोडला जात आहे. १७ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपासून सक्त वसुली संचालनालयाच्या पथकांकडून राजमल लखीचंद ज्वेलर्संची तपासणी करण्यात येऊन जळगाव, नाशिक, ठाणे येथील शोरूममधून रोख रकमेसह सोन्याचा साठा जप्त करण्यात आला होता. आता ईडीने आरएल समुहाची अनेक ठिकाणची संपत्ती जप्त केली आहे. 

राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक फसवणूक प्रकरणात ED ने ही कारवाई केली आहे. त्यानुसार, जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छ यासह इतर भागात असलेल्या 70 स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्तेचे मूल्य रु. 315.60 कोटी एवढे आहे. दरम्यान, आर.एल गोल्ड प्रा. लि. आणि मेसर्स मनराज ज्वेलर्स प्रा. लिमिटेड यांच्यावर पीएमएलए २००२ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJalgaonजळगाव