शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर पंतप्रधान गप्प का?; राहुल गांधी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:23 IST

रोजगाराच्या मुद्यावर दोन मिनिटे तरी बोलायला हवे होते.

नवी दिल्ली : भाषणामध्ये सतत पं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचा उल्लेख करणारे पंतप्रधान देशातील बेरोजगारीविषयी मात्र मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या उत्तराचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, ढासळती अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी हे देशापुढील आजचे सर्वात मोठे प्रश्न आहेत. पण त्याला पंतप्रधान सातत्याने बगल देऊ न भलत्याच विषयांवर बोलत आहेत.

ते म्हणाले की, पंतप्रधान आज सुमारे दीड तास लोकसभेत बोलले. त्यापैकी किमान दोन मिनिटे तरी कोट्यवधी तरुणांना रोजगार देण्यासाठी काय केले आणि काय करणार आहात, यावर त्यांनी बोलायला हवे होते. पण त्यांनी त्याविषयी अवाक्षरही काढले नाही.पूर्वी पंतप्रधान मोदी नेहमी मेक इन इंडिया, स्टार्ट अप, ५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था यांवर बोलत असायचे. आता मात्र या विषयांवर वा देशापुढील समस्यांवर न बोलता, ते पाकिस्तान, बांग्लादेश व जवाहरलाल नेहरू यांच्यावरच बोलू लागले आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान, अर्थमंत्री अयशस्वी : पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे दोघेही तरुणांना रोजगार देण्यात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपा