शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर पंतप्रधान गप्प का?; राहुल गांधी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:23 IST

रोजगाराच्या मुद्यावर दोन मिनिटे तरी बोलायला हवे होते.

नवी दिल्ली : भाषणामध्ये सतत पं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचा उल्लेख करणारे पंतप्रधान देशातील बेरोजगारीविषयी मात्र मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या उत्तराचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, ढासळती अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी हे देशापुढील आजचे सर्वात मोठे प्रश्न आहेत. पण त्याला पंतप्रधान सातत्याने बगल देऊ न भलत्याच विषयांवर बोलत आहेत.

ते म्हणाले की, पंतप्रधान आज सुमारे दीड तास लोकसभेत बोलले. त्यापैकी किमान दोन मिनिटे तरी कोट्यवधी तरुणांना रोजगार देण्यासाठी काय केले आणि काय करणार आहात, यावर त्यांनी बोलायला हवे होते. पण त्यांनी त्याविषयी अवाक्षरही काढले नाही.पूर्वी पंतप्रधान मोदी नेहमी मेक इन इंडिया, स्टार्ट अप, ५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था यांवर बोलत असायचे. आता मात्र या विषयांवर वा देशापुढील समस्यांवर न बोलता, ते पाकिस्तान, बांग्लादेश व जवाहरलाल नेहरू यांच्यावरच बोलू लागले आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान, अर्थमंत्री अयशस्वी : पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे दोघेही तरुणांना रोजगार देण्यात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपा