शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

निकालापूर्वी विरोधकांना दुहेरी झटका, ईव्हीएम संशयावरुन EC आणि SC दोघांनी फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:55 IST

सर्व ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट पक्षाच्या उमेदवारांसमक्ष सुरक्षित सीलबंद केल्या आहेत. त्याचे व्हिडीओही काढण्यात आले आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. व्हीव्हीपॅट मतदानाची 100 टक्के मतमोजणी करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. इतकचं नाहीतर प्रत्येक वेळेला त्याच त्याच विषयांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे. 

याचदरम्यान मंगळवारी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षात बैठक होणार आहे. त्यानंतर ईव्हीएमबाबतीत निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. ईव्हीएमवर घेतलेल्या संशयावरुन निवडणूक आयोगाने यूपीतील 4 याचिका फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएम सुरक्षित असून त्यावर विश्वास ठेवावा असं निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

एका याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात याचिका करत मतदानाच्या पडताळणीसाठी ईव्हीएमसोबत जोडलेल्या व्हीव्हीपॅटच्या पावत्यांचीही मतमोजणी करावी अशी मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार सर्व ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट पक्षाच्या उमेदवारांसमक्ष सुरक्षित सीलबंद केल्या आहेत. त्याचे व्हिडीओही काढण्यात आले आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. उत्तर प्रदेशात निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या सुरक्षेला घेऊन केलेल्या याचिका फेटाळल्या. राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर विश्वास ठेवावा. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे. एक्झिट पोलनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय पराभवाच्या भितीपोटी घेतला जातोय अशी टीका भाजपाने विरोधकांवर केली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

'ईव्हीएमवर संशय नको म्हणून 3 राज्यात काँग्रेसचा विजय; हे तर भाजपाचं षडयंत्र'

मात्र काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील काँग्रेसच्या विजयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जर एक्झिट पोलप्रमाणे निकाल लागले तर ज्या राज्यात काँग्रेस जिंकली ते फक्त भाजपाचं षडयंत्र होतं असा आरोप त्यांनी केला. या तीन राज्यातील निकाल काँग्रेसच्या बाजूने देऊन ईव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय दूर करण्याचा भाजपाचा डाव होता हे सिद्ध होईल असं त्यांनी सांगितलं होतं. तर ममता बॅनर्जी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VVPATव्हीव्हीपीएटीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग