शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

सीमेवर परिस्थिती बिघडली तर संबंध सुधारणार नाहीत, एस जयशंकर यांनी चीन-पाकिस्तानला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 21:48 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पाकिस्तान आणि चीनवर टीका केली.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पाकिस्तान आणि चीनमधील संबंधांबाबत फटकारलं. 'सीमेवरील परिस्थिती दोन्ही देशांमधील संबंध ठरवेल, जोपर्यंत सीमेवरील दहशतवादात कोणताही बदल होत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी संबंध चांगले होणार नाहीत. तसेच चीन संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले, आजही सीमेवर परिस्थिती सामान्य नाही.

चीनचेच जैविक शस्त्र होते कोरोना! आखला होता मोठा प्लॅन; वुहानच्या संशोधकानं केला बडा खुलासा

दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, भारताचे चीनसोबतचे संबंध सध्या चांगले नाहीत. कोणत्याही नात्याचा धागा त्यांच्या भावनेवर उभा असतो. त्या नात्यात आदर असायला हवा. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर आमचे संबंध बिघडले. जोपर्यंत तेथे शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत.

एस जयशंकर हे चीनबाबत पहिल्यांदाच बोलत नाहीत. याआधीही ते अनेकदा बोलले आहेत.'जेव्हा सीमेवर परिस्थिती चांगली असेल तेव्हाच चीनशी संबंध मधुर होतील. जयशंकर यांनी चीन-पाकिस्तान व्यतिरिक्त भारताच्या रशिया आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांवर चर्चा केली. ते म्हणाले की, अमेरिकेसोबत आमचे संबंध खूप चांगले आहेत.

टॅग्स :chinaचीनS. Jaishankarएस. जयशंकर