शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 16:22 IST

शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं रामदेव बाबा म्हणाले आहे.

नवी दिल्लीः सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावर चीनचा बहिष्कार केला पाहिजे. आपली सेना देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं बाबा रामदेव म्हणाले आहे. आज तकच्या ई-अजेंटा सुरक्षा सभा या कार्यक्रमात ते बोलत होते. कारण चीन आपल्या देशांत 15 ते 20 लाख कोटींचा व्यवसाय करतो. टॉयलेट सीटपासून खेळण्यांपर्यंत चीनची उत्पादनं आपल्याकडे आयात केली जातात, असंही बाबा रामदेवांनी सांगितलं आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी मोठे ठराव करावे लागतील. मी गेल्या तीन दशकांत कोणतेही चिनी उत्पादन वापरलेले नाही. जर चीनला धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक भारतीयानं चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा हा उत्तम मार्ग आहे, असंही बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे. जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून भारत-चिनी भाऊ-भाऊचा नारा दिला जात असून, चीन आपल्याला लुटत आहे. अशा परिस्थितीत केवळ चिनी उत्पादनांवर बहिष्कारच नाही, तर त्याच्याविरोधात द्वेषाचे वातावरण देखील निर्माण करावे लागेल.चीनमधून आयात आणि निर्यातीच्या प्रश्नावर बाबा रामदेव म्हणाले की, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याबरोबरच आपण देशी वस्तूंसाठीही धोरण तयार केले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनात्मक आणि आंतरराष्ट्रीय करारांशी बांधील आहेत. पंतप्रधानांनी राजकीयदृष्ट्या काय केले पाहिजे ते करत आहेत. पण भारताला चीनचा पर्याय बनवण्यासाठी देशात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी यांच्या उत्पादनाचे केंद्र बनवावे लागेल. पतंजली देशात मोठी कंपनी तयार करण्यात आली असून, वेगवेगळी उत्पादने बनवते. देशात इतरही अनेक कंपन्या आहेत, ज्यांना यापूर्वी स्वत: ला स्वदेशी म्हणायला लाज वाटत होती. हे सर्व लोक आज अभिमानाने स्वदेशी म्हणत आहेत. चीनसमोर उभे राहण्यासाठी, संपूर्ण कृती योजना तयार करावी लागेल आणि त्या समान सामग्री तयार करावी लागेल.बाबा रामदेव यांनी सरकारला तीन सूचना दिल्या१. बाबा रामदेव म्हणाले की, चीनविरुद्ध उभे राहण्यासाठी सरकारने विशेष आर्थिक विभाग तयार करावा किंवा देशातील कुठल्याही कंपनीला चीनचा पर्याय म्हणून वस्तू बनवायच्या असतील तर सरकारने त्यास सूट दिली पाहिजे.२. बाबा रामदेव यांनी सरकारला आणखी एक सूचना दिली की, चीनमधून येणा-या सर्व उत्पादनांवर करात प्रचंड वाढ केली पाहिजे, जेणेकरून लोक तिथून सामान आणण्याबद्दल बर्‍याचदा विचार करतील.३. बाबा रामदेव म्हणाले की, सर्व सरकारी यंत्रणेने संयुक्तपणे असे वातावरण तयार केले पाहिजे की भारतातील लोक जास्तीत जास्त स्वदेशी उत्पादने बनवू शकतील आणि लोक ते वापरू शकतील. जपान, दक्षिण कोरियासह बर्‍याच देशांमध्ये या प्रकारचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा