शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

डोळ्यात धूळफेक; ‘आयुष्मान’ विम्याचा फील गुड जुमला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:56 IST

‘अच्छा स्वास्थ्य अब सबका अधिकार’हे आहे आरोग्य सेवांबाबतचे मोदी सरकारचे घोषवाक्य. सरकारच्या ४ वर्षांच्या कामांच्या जाहिरातींत जगातल्या सर्वात मोठ्या असे बिरूद लावलेल्या ‘आयुष्मान’ आरोग्य विमा योजनेचा उल्लेख आहे.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - ‘अच्छा स्वास्थ्य अब सबका अधिकार’हे आहे आरोग्य सेवांबाबतचे मोदी सरकारचे घोषवाक्य. सरकारच्या ४ वर्षांच्या कामांच्या जाहिरातींत जगातल्या सर्वात मोठ्या असे बिरूद लावलेल्या ‘आयुष्मान’ आरोग्य विमा योजनेचा उल्लेख आहे. देशातल्या ५0 कोटी लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा योजनेद्वारे मिळणार असल्याचे वचन मोदी सरकारने दिले आहे. ही विमा योजना, डोळ्यात धूळफेक करणारे नाटक म्हणायचे की अमित शहांच्या भाषेत चुनावी जुमला!खासगी व सरकारी रुग्णालयात आज खाटांची संख्या आहे १३ लाख ७३ हजार. खासगी रुग्णालयात ८ लाख ३३ हजार तर सरकारी रुग्णालयात ५ लाख ४0 हजार खाटा. त्यापैकी.७0 टक्के खाटा फक्त निवडक शहरांत आहेत. सरकारी रुग्णालयातल्या बऱ्याच खाटा सेवेसाठी उपयोगाच्या नाहीत, कारण तिथे डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचा-यांची कमतरता आहे. शहरांची ही अवस्था आहे तर तर खेडी अन् निमशहरी गावांची स्थिती किती विदारक असू शकते याचा अंदाजयेऊ शकतो.देशात १000 लोकांमागे 0.३ ते 0.५ पेक्षा अधिक डॉक्टर्स नाहीत. झांबिया वा गॅबन या अविकसित देशांची स्थिती यापेक्षा चांगली आहे. झांबियात १ हजार लोकसंख्येमागे किमान २.00 तर गॅबनमधे ६.३ खाटा आहेत. भारतात १ हजार लोकांमागे फक्त 0.९ खाटा आहेत. क्युबाची स्थितीही भारतासारखीच होती, मात्र संरक्षण बजेटमध्ये तडजोड करून क्युबाने आरोग्य सेवांना प्राधान्यदिले.ओडिशा, छत्तीसगड, राजस्थानच्या ग्रामीण रुग्णालयांमधे ९0 टक्के तर उत्तराखंडात ८५ टक्के स्पेशालिस्ट डॉक्टर्स नाहीत. बिहार व झारखंडात १0 हजारांच्या लोकसंख्येमागे 0.५ जनरल फिजिशिअन आहेत. जे लोक धार्मिक वा जातीपातीच्या वैरातून परस्परांशी भांडत असतात, तेच लोक रुग्णालयांत अपुºया उपचारांमुळे डॉक्टर्सवर हल्ले चढवतात. रुग्णालयात तोडफोड करतात.ग्रामीण लोकसंख्या २0११ च्या जनगणनेनुसार ८३ कोटी होती. उपचार करणाºया डॉक्टर्सची संख्या मात्र ४५ हजार ६२ होती. जनगणनेनंतरच्या आठ वर्षात, मोदी सरकारच्या काळातही स्थिती तशीच आहे. कारण आरोग्यासाठी किरकोळ तरतूद केली आहे व तीही खर्च होत नाही. आज ५0 हजारांहून अधिक भारतीय डॉक्टर्स अमेरिकेत आहेत. पंतप्रधानांच्या मेडिसन स्केअरच्या सभेत तिरंगे ध्वज फडकावून ‘मोदी’ ‘मोदी’ असा पुकारा करणाºयांमध्ये हेच डॉक्टर्स आघाडीवर होते. पण येथील विदारक आरोग्य सेवांचे त्यांना सोयरसुतक नाही.पुरेसे डॉक्टर्सच नाहीत तर आरोग्य विम्याचा उपयोग तरी काय? वाजतगाजत जाहीर झालेला ‘आयुष्मान’ सारखा आरोग्य विमा बेवकूफ बनवण्याचे अवजार आहे. उद्या आजारपणाचे संकट उद्भवलेच्,ा तर खर्च करावा लागणार नाही, याचे समाधान मनात आहे. कारण सरकारने ‘आयुष्मान’ची सोय केली आहे. पण हाही तोंडदेखला ‘फिल गुड’ फॅक्टर आहे. मोदींच्या ‘मन की बात’ द्वारे तुम्हाला असा आनंद वारंवार मिळालाच आहे. दरवर्षी तुमचा खिसा हलका करणारा हा आरोग्य विमा, फारसा केवळ एक रद्दी कागद आहे.झांबिया व गॅबन या अविकसित देशांपेक्षाही भारतातील स्थिती वाईट

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतHealthआरोग्यHealthcare Budget 2018आरोग्य बजेट २०१८Indiaभारत