शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

"दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही पण लोकांना मिठी मारण्यासाठी..."; मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:04 IST

पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले हे सरकारला विचारायचे आहे आहे असं म्हणत मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारवर निशाणा साधला.

Mallikarjun Kharge: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान राज्यसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की तुम्ही चुका करता आणि इतरांना दोष देता. पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले हे सरकारला विचारायचे आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं. तसेच सरकारने सत्य ऐकण्याचे धाडस दाखवावे, चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी सभागृहात बसायला हवं, असं म्हणत खरगेंनी सरकारवर निशाणा साधला.

"पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांनाही मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही नेहमीच पाकिस्तानचा आणि दहशतवाद्यांना त्याच्या पाठिंब्याचा निषेध केला आहे आणि करत राहू. पण आम्ही त्याचा निषेध करत असतानाच पंतप्रधान मोदी एका मेजवानीला जातात आणि पाकिस्तानी पंतप्रधानांना मिठी मारतात," अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

"लोकसभेचे खासदार राहुल गांधी आणि मी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती, पण पत्राला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आमची पत्रे कचऱ्याच्या पेटीत टाकली जातात. ते ती वाचतही नाहीत. जर तुमच्यात एवढा अहंकार असेल तर एक दिवस तुमचा अहंकार मोडून काढणारे लोक येतील. हे चांगले नाही. तुमच्याकडे एक-दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही. पण लोकांना मिठी मारण्यासाठी वेळ आहे," असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"पाकिस्तानसोबत कोणत्या अटींवर युद्धबंदी झाली? अचानक युद्धबंदी का जाहीर करण्यात आली? कोणाच्या दबावाखाली युद्धबंदी जाहीर करण्यात आली. कोणताही देश उघडपणे भारतासोबत उभा राहिला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या विधानावर पंतप्रधान मोदी गप्प का आहेत. केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले आहे.पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींनी त्यांचा दौरा रद्द केला होता. मी याआधीही याचे उत्तर मागितले होते, पण मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. मी आजही विचारत आहे की सरकारला हल्ल्याची आधीच काही माहिती होती का? जर हो, तर तुम्ही पर्यटकांना तिथे का जाऊ दिले?," असा सवाल खरगे यांनी केला. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRajya Sabhaराज्यसभा