शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

"दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही पण लोकांना मिठी मारण्यासाठी..."; मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:04 IST

पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले हे सरकारला विचारायचे आहे आहे असं म्हणत मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारवर निशाणा साधला.

Mallikarjun Kharge: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान राज्यसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की तुम्ही चुका करता आणि इतरांना दोष देता. पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले हे सरकारला विचारायचे आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं. तसेच सरकारने सत्य ऐकण्याचे धाडस दाखवावे, चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी सभागृहात बसायला हवं, असं म्हणत खरगेंनी सरकारवर निशाणा साधला.

"पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांनाही मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही नेहमीच पाकिस्तानचा आणि दहशतवाद्यांना त्याच्या पाठिंब्याचा निषेध केला आहे आणि करत राहू. पण आम्ही त्याचा निषेध करत असतानाच पंतप्रधान मोदी एका मेजवानीला जातात आणि पाकिस्तानी पंतप्रधानांना मिठी मारतात," अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

"लोकसभेचे खासदार राहुल गांधी आणि मी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती, पण पत्राला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आमची पत्रे कचऱ्याच्या पेटीत टाकली जातात. ते ती वाचतही नाहीत. जर तुमच्यात एवढा अहंकार असेल तर एक दिवस तुमचा अहंकार मोडून काढणारे लोक येतील. हे चांगले नाही. तुमच्याकडे एक-दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही. पण लोकांना मिठी मारण्यासाठी वेळ आहे," असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"पाकिस्तानसोबत कोणत्या अटींवर युद्धबंदी झाली? अचानक युद्धबंदी का जाहीर करण्यात आली? कोणाच्या दबावाखाली युद्धबंदी जाहीर करण्यात आली. कोणताही देश उघडपणे भारतासोबत उभा राहिला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या विधानावर पंतप्रधान मोदी गप्प का आहेत. केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले आहे.पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींनी त्यांचा दौरा रद्द केला होता. मी याआधीही याचे उत्तर मागितले होते, पण मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. मी आजही विचारत आहे की सरकारला हल्ल्याची आधीच काही माहिती होती का? जर हो, तर तुम्ही पर्यटकांना तिथे का जाऊ दिले?," असा सवाल खरगे यांनी केला. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRajya Sabhaराज्यसभा