शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

मोदी यांच्या काळात ईडीच्या धाडीत २,६०० टक्के वाढ; जप्तीचे प्रमाण १,८०० टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 06:52 IST

संपुआच्या १० वर्षांशी तुलना; केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केली आकडेवारी

- हरीश गुप्तानवी दिल्ली : २००४-२०१४ या काळातील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारच्या तुलनेत मागील सात वर्षांत (मोदी यांचा कार्यकाळ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल २,६०० टक्के अधिक धाडी टाकल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.प्राप्त माहितीनुसार, २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात ईडीने फक्त ११२ धाडी टाकल्या होत्या. याउलट २०१४ ते २०२२ (२८ फेब्रुवारीपर्यंत) या काळात २,९७४ धाडी टाकण्यात आल्या. याचाच अर्थ संपुआ सरकारच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात ईडीच्या धाडीत २,६०० टक्के वाढ झाली आहे. मोदी यांच्या कार्यकाळात संपत्ती जप्तीचे प्रमाणही १,८०० टक्क्यांनी वाढले आहे. २००४ ते २०१४ या काळात ५,३४६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मोदी यांच्या कार्यकाळात मात्र ९५,४३२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. काँग्रेस सरकारच्या तुलनेत १८ पट अधिक जप्ती मोदी काळात झाली आहे. ईडीने ४,९६४ अंमलबजावणी गुन्हे माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंदले आहेत. आकडेवारी काय सांगते?२८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एकूण ९४३ प्रकरणांत फिर्याद तक्रारी (प्रोसेक्युशन कम्प्लेन्ट) दाखल करण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रकरणे खटल्यांच्या विविध टप्प्यात आहेत. १५  मार्च २०२२ पर्यंत मनी लाँड्रिंग विशेष न्यायालयाकडून २३ आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच केवळ एका खटल्यात आरोपी गुणवत्तेच्या आधारावर मुक्त झाला आहे.यातील ८३९ फिर्याद तक्रारी (प्रोसेक्युशन कम्प्लेन्ट) मागील सात वर्षांत दाखल झाल्या आहेत. २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात केवळ १०४ फिर्याद तक्रारी दाखल झाल्या होत्या.ईडीच्या धाडीतील विक्रमी वाढीचे सरकारकडून जोरदार समर्थन करण्यात आले आहे. वाढलेल्या धाडीतून मनी लाँड्रिंग रोखण्याच्या बाबतीत सरकारची कटिबद्धता तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुप्त वित्तीय माहिती गोळा करण्याच्या व्यवस्थेत झालेली सुधारणा दिसून येत आहे, असे सरकारने म्हटले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय