शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुर्गापूजेला हिंसा खपवून घेतली जाणार नाही, मुहर्रमदरम्यान मुर्ती विसर्जन नाही - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 19:21 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सणाच्या पार्श्वभुमीवर चेतावणी देताना सणांच्या नावाखाली राजकारण खपवून घेतलं जाणार नाही असं सांगितलं आहे. तसंच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन होणार नाही हे स्पष्ट केलं आहे

कोलकाता, दि. 16 - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सणाच्या पार्श्वभुमीवर चेतावणी देताना सणांच्या नावाखाली राजकारण खपवून घेतलं जाणार नाही असं सांगितलं आहे. तसंच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. याआधीही ममता बॅनर्जी यांनी मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जन करू नये आणि हिंदू व मुस्लीमांनी सौहार्दाचं वातावरण ठेवावं असं आवाहन केलं होतं. 

ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, 'दुर्गापूजेदरम्यान कोणतीही हिंसा खपवून घेतली जाणार नाही. मुहर्रमदरम्यान मुर्ती विसर्जन होणार नाही. सणांच्या नावाखाली होणारी हिंसा खपवून घेतली जाणार नाही'. पश्चिम बंगालमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे हा महिना संवेदनशील असणार आहे. 

या वर्षी दस-च्या दुसऱ्या दिवशी मुहर्रम येत आहे. याच दिवशी दुर्गा विसर्जन करण्यात येतं. त्यामुळे दोन्ही मिरवणुका समोरासमोर आल्या तर तणावाचं वातावरण होऊ शकतं, अनुचित प्रकार घडू शकतात, त्यामुळे दुर्गा विसर्जन या दिवशी न करण्याचं आवाहन बॅनर्जी यांनी केलं होतं. एकमेकांना सहकार्य करा आणि सौहार्दाचं वातावरण राखा असं त्यांनी म्हटलं होतं. 

धार्मिक तेढ निर्माण व्हावं यासाठी काही घटक लोकांना भडकवतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त करताना त्याचा राजकीय फायदाही उठवला जाईल अशी शक्यता बॅनर्जी यांनी उपस्थित केली होती. दुर्गा पूजा समित्यांची त्यांनी बैठक बोलावली होती, यावेळी त्यांनी ही मते व्यक्त केली होती. काही जण राजकीय लाभ पदरात पाडण्यासाठी झटत आहेत, अशावेळी आपण कशाला अंगावर बालंट घ्यायचं असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

बॅनर्जी यांनी पोलीस अधिक्षकांना राज्यभरात जिल्हा पातळीवरील दुर्गा समित्यांशी व मुहर्रम समित्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले होते. एक ऑक्टोबर रोजी मुहर्रम आहे आणि त्याचदिवशी पारपंरिकरीत्या दुर्गा विसर्जनाचा दिवस यंदा येत आहे. रेड रोड कार्निवल 3 ऑक्टोबर रोजी करण्याचे व दुर्गा विसर्जनासाठी 4 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्याचे त्यांनी सांगितले होते. समाजात तेढ वाढेल अशा सोशल मीडियातील पोस्टना बली पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं होतं.  

टॅग्स :Navratriनवरात्री