शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापूजेला हिंसा खपवून घेतली जाणार नाही, मुहर्रमदरम्यान मुर्ती विसर्जन नाही - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 19:21 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सणाच्या पार्श्वभुमीवर चेतावणी देताना सणांच्या नावाखाली राजकारण खपवून घेतलं जाणार नाही असं सांगितलं आहे. तसंच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन होणार नाही हे स्पष्ट केलं आहे

कोलकाता, दि. 16 - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सणाच्या पार्श्वभुमीवर चेतावणी देताना सणांच्या नावाखाली राजकारण खपवून घेतलं जाणार नाही असं सांगितलं आहे. तसंच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. याआधीही ममता बॅनर्जी यांनी मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जन करू नये आणि हिंदू व मुस्लीमांनी सौहार्दाचं वातावरण ठेवावं असं आवाहन केलं होतं. 

ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, 'दुर्गापूजेदरम्यान कोणतीही हिंसा खपवून घेतली जाणार नाही. मुहर्रमदरम्यान मुर्ती विसर्जन होणार नाही. सणांच्या नावाखाली होणारी हिंसा खपवून घेतली जाणार नाही'. पश्चिम बंगालमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे हा महिना संवेदनशील असणार आहे. 

या वर्षी दस-च्या दुसऱ्या दिवशी मुहर्रम येत आहे. याच दिवशी दुर्गा विसर्जन करण्यात येतं. त्यामुळे दोन्ही मिरवणुका समोरासमोर आल्या तर तणावाचं वातावरण होऊ शकतं, अनुचित प्रकार घडू शकतात, त्यामुळे दुर्गा विसर्जन या दिवशी न करण्याचं आवाहन बॅनर्जी यांनी केलं होतं. एकमेकांना सहकार्य करा आणि सौहार्दाचं वातावरण राखा असं त्यांनी म्हटलं होतं. 

धार्मिक तेढ निर्माण व्हावं यासाठी काही घटक लोकांना भडकवतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त करताना त्याचा राजकीय फायदाही उठवला जाईल अशी शक्यता बॅनर्जी यांनी उपस्थित केली होती. दुर्गा पूजा समित्यांची त्यांनी बैठक बोलावली होती, यावेळी त्यांनी ही मते व्यक्त केली होती. काही जण राजकीय लाभ पदरात पाडण्यासाठी झटत आहेत, अशावेळी आपण कशाला अंगावर बालंट घ्यायचं असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

बॅनर्जी यांनी पोलीस अधिक्षकांना राज्यभरात जिल्हा पातळीवरील दुर्गा समित्यांशी व मुहर्रम समित्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले होते. एक ऑक्टोबर रोजी मुहर्रम आहे आणि त्याचदिवशी पारपंरिकरीत्या दुर्गा विसर्जनाचा दिवस यंदा येत आहे. रेड रोड कार्निवल 3 ऑक्टोबर रोजी करण्याचे व दुर्गा विसर्जनासाठी 4 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्याचे त्यांनी सांगितले होते. समाजात तेढ वाढेल अशा सोशल मीडियातील पोस्टना बली पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं होतं.  

टॅग्स :Navratriनवरात्री