शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

साखर कारखान्याच्या कचऱ्याच्या विषारी वायुमुळे युपीत 300 विद्यार्थी आजारी, 35 मुलांची स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 14:48 IST

शाळेजवळच्या साखर कारखान्यातून बाहेर पडलेल्या रासायनिक कचऱ्यापासून बनलेल्या वायूमुळे तब्बल 300 विद्यार्थी आजारी पडले आहेत. सरस्वती शिशू मंदीरचे हे विद्यार्थी असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

ठळक मुद्देशेकडो मुलांना अस्वस्थ वाटायला लागलं, पोटदुखीचा त्रास झाला तर अनेकांना चक्कर आलीया मुलांपैकी जवळपास 35 मुलं गंभीर आजारी असल्याचं सांगण्यात येतंयप्रकृती गंभीर झालेल्या काही मुलांना मीरतच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे

शामली, उत्तर प्रदेश - शाळेजवळच्या साखर कारखान्यातून बाहेर पडलेल्या रासायनिक कचऱ्यापासून बनलेल्या वायूमुळे तब्बल 300 विद्यार्थी आजारी पडले आहेत. सरस्वती शिशू मंदीरचे हे विद्यार्थी असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेकडो मुलांना अस्वस्थ वाटायला लागलं, पोटदुखीचा त्रास झाला तर अनेकांना चक्कर आली. या मुलांपैकी जवळपास 35 मुलं गंभीर आजारी असल्याचं सांगण्यात येतंय. प्रकृती गंभीर झालेल्या काही मुलांना मीरतच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

जवळपास 30 ते 35 मुलांचा आजार बळावला असून 15 जणांना मीरतला हलवण्यात आल्याचं जिल्हा प्रशासकीय अधिकारी सुरजीत सिंह यांनी सांगितलं. बहुसंख्य मुलांना गंभीर आजार झालेला नसल्याची चांगली बातमी डॉक्टरांनी दिली आहे. परंतु, मुलांच्या पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.

अनेक मुलांवर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. साखर कारखान्यातील कचरा एका उघड्या जागेत टाकण्यात आला. ही जागा शाळेपासून जवळच आहे. या कचऱ्यातून वायू उत्सर्जन झाले जे विषारी होते. या वायुची लागण झालेल्या मुलांना त्रास झाला आहे. ज्यावेळी मुलं या भागातून शाळेत जात होती, त्याचवेळी हा कचरा जाळण्याचं काम सुरू करण्यात आलं आणि त्यामुळं ही मुलं या विषारी वायुच्या तावडीत सापडली.

काही मुलं तर बेशुद्ध पडली तर काहीजण शाळेत पोचल्यावर आजारी पडली. शेकडो मुलं वायुची लागण झाल्यामुळे चक्कर येऊन पडली. शिक्षकांनी तातडीने या मुलांना रुग्णालयात हलवले. 

टॅग्स :SchoolशाळाUttar Pradeshउत्तर प्रदेश