शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मणिपूरमधील स्थितीमुळे १४ हजार मुलं  विस्थापित, सोडावे लागले घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 08:28 IST

सुमारे १४ हजार शालेय विद्यार्थ्यांना मणिपूरमधील स्थितीमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली.

इम्फाळ : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षाचा मोठा फटका तेथील शालेय विद्यार्थ्यांनाही बसला आहे. सुमारे १४ हजार शालेय विद्यार्थ्यांना मणिपूरमधील स्थितीमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली.

यासंदर्भात राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, विस्थापित झालेल्या १४,७६३ शालेय विद्यार्थ्यांपैकी ९३.५ टक्के मुलांना त्यांच्या गावापासून जवळच असलेल्या दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशात कोणत्याही अडचणी येऊ नयेत याकरिता प्रत्येक निवारा छावणीत एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या मुलांना शालेय प्रवेश देताना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. 

रिकाम्या घरांना लावली आग इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील एका गावात विशिष्ट समुदायाच्या दोन रिकाम्या घरांना अज्ञात व्यक्तींनी बुधवारी पहाटे आग लावली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझविली. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या हिंसाचारात १६०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारStudentविद्यार्थीEducationशिक्षणHomeसुंदर गृहनियोजन