शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

मणिपूरमधील स्थितीमुळे १४ हजार मुलं  विस्थापित, सोडावे लागले घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 08:28 IST

सुमारे १४ हजार शालेय विद्यार्थ्यांना मणिपूरमधील स्थितीमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली.

इम्फाळ : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षाचा मोठा फटका तेथील शालेय विद्यार्थ्यांनाही बसला आहे. सुमारे १४ हजार शालेय विद्यार्थ्यांना मणिपूरमधील स्थितीमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली.

यासंदर्भात राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, विस्थापित झालेल्या १४,७६३ शालेय विद्यार्थ्यांपैकी ९३.५ टक्के मुलांना त्यांच्या गावापासून जवळच असलेल्या दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशात कोणत्याही अडचणी येऊ नयेत याकरिता प्रत्येक निवारा छावणीत एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या मुलांना शालेय प्रवेश देताना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. 

रिकाम्या घरांना लावली आग इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील एका गावात विशिष्ट समुदायाच्या दोन रिकाम्या घरांना अज्ञात व्यक्तींनी बुधवारी पहाटे आग लावली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझविली. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या हिंसाचारात १६०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारStudentविद्यार्थीEducationशिक्षणHomeसुंदर गृहनियोजन