शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दिल्लीत मुसळधार पावसानं विमानतळ टर्मिनल-१ वर लोखंडी छत अंगावर पडले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 07:33 IST

पहाटे विमानतळावर वाहतूक अन् गर्दी कमी असल्याने मोठी मनुष्यहानी टळली, मुसळधार पावसाच्या तडाख्याने विमानतळावरील टर्मिनल-१ वरील छताचा काही भाग कोसळला. 

नवी दिल्ली : विमानतळाच्या टर्मिनल-१ वर शुक्रवारी छताचा काही भाग कोसळला तेव्हा काहीही तुटल्यासारखा मोठा आवाज आला नाही. मात्र, लोखंडी बीम (छताचा काही भागासह) गाड्यांवर पडल्याने लोकांना घटनेची माहिती मिळाल्याने तेथे गोंधळ उडाला आणि लोक मदतीसाठी आरडाओरड करताना दिसले. अपघातावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने ही माहिती दिली.

राष्ट्रीय राजधानीत मुसळधार पावसात शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ‘टर्मिनल-१’ च्या छताचा काही भाग वाहनांवर पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. टर्मिनलच्या ‘पिक-अप’ आणि ‘ड्रॉप’ भागात छताचा काही भाग आणि सपोर्टिंग बीम कोसळल्याने अनेक कारचे नुकसान झाले.

दुसऱ्या कॅब चालकाने सांगितले की, अपघाताच्या वेळी तेथे खूप कमी लोक उपस्थित होते आणि वाहतूक देखील कमी होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्युटीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना आणि विमानतळावर तैनात असलेल्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.

अनेक रस्ते जलमय, वाहतुकीचा बोजवारागेल्या ८८ वर्षांनंतर जून महिन्यात एका दिवसातला सर्वाधिक पाऊस शुक्रवारी सकाळी कोसळला. त्यामुळे दिल्लीतील अनेक रस्ते जलमय झाले, वाहतुकीचा बोजवारा उडाला. मुसळधार पावसाच्या तडाख्याने विमानतळावरील टर्मिनल-१ वरील छताचा काही भाग कोसळला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २० ते ३० तासांत दिल्लीत सफदरजंग येथे २२८.१ मिमी पावसाची नोंद झाली. लोधी रोड येथे १९२.८ मिमी, पालम येथे १०६.६ मिमी, आयानगर येथे ६६.३ मिमी पाऊस पडला आहे.  जूनमधील सरासरी ७४.१ मिमी पावसापेक्षा हे तिप्पट प्रमाण आहे. 

खासदारांच्या बंगल्यांतही पाणीदिल्लीच्या पाणीपुरवठा खात्याचे मंत्री रामगोपाल यादव, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, मनीष तिवारी, समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांच्यासह अनेक नेत्यांच्या बंगल्यातही पाणी शिरले असल्याचे सांगण्यात आले.

सरकारचा दावा फोल : काँग्रेसगेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधांचे निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामात भ्रष्टाचार झाला असल्याची टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर केली. जबलपूर विमानतळाचे कोसळलेले छत, अयोध्येतील नव्या रस्त्यांची दुरवस्था, राममंदिरामधील पाणीगळती, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकरोडला गेलेले तडे, मोरबी पूल कोसळण्याची घटना ही निकृष्ट बांधकामांची काही उदाहरणे आहेत. आम्ही जागतिक दर्जाची बांधकामे केली हा सरकारचा दावा त्यामुळे फोल ठरला आहे, असे खरगे म्हणाले. 

टॅग्स :delhiदिल्लीAirportविमानतळRainपाऊस