शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

या कारणांमुळे दिल्लीतील काँग्रेस-आप आघाडीच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:21 IST

राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्येकाँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र राहुल गांधी यंनी आपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. आज आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली काँग्रेस आणि आपची आघाडी होण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. त्यापैकी प्रमुख पाच कारणे खालीलप्रमाणे आहेत.  1) दिल्लीतील सात जागांवर आघाडी करण्यासाठी काँग्रेसने आपसोबत चर्चा केली असती तर आपने गोवा, पंजाब आणि हरयाणामध्येही आघाडीचा विषय पुढे आणला असता, काँग्रेससाठी ते अडचणीचे ठरले असते. त्यामुळे काँग्रेसला केवळ दिल्लीमध्येच आपसोबत आघाडी करायची आहे.2) दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आप आग्रही आहे. त्यांनी दिल्लीतील जनतेला तसे आश्वासनही दिले आहे. मात्र काँग्रेसच्या मते हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे घाईगडबडीत यासंदर्भात आश्वासन देता येणार नाही, असे काँग्रेसचे मत आहे. तर आप या मुद्यावर माघार घेण्यास तयार नाही. 3) एकीकडे काँग्रेसशी आघाडीबाबत चर्चा सुरू असताना अरविंद केजरीवाल हे प्रसारमाध्यमांमध्ये आघाडीबाबत सातत्याने वक्तव्ये करत आहेत. तसेच आघाडीसाठी होत असलेल्या उशिराचे खापर काँग्रेसच्या माथ्यावर फोडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे.4) आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य आहे. पण आम आदमी पक्षाच्या एकंदरीत धोरणामधून त्यांच्या हेतूबाबत शंका येत होती. आप हा काँग्रेसचा मित्र आहे की शत्रू हेच काँग्रेलला ठरवता येत नव्हते. त्यामुळे आपवर विश्वास ठेवणे काँग्रेसला काहीसे कठीण होत आहे. 5) एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असतानाच दिल्लीतील सातही जागांवर बलाढ्य उमेदवार उतरवण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. तसेच दिल्लीतील आपल्या आक्रमक अभियानासाठी दिल्लीती 70 आमदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे दिल्लीत तिरंगी लढल होण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdelhiदिल्लीcongressकाँग्रेसAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधी