शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

या कारणांमुळे दिल्लीतील काँग्रेस-आप आघाडीच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:21 IST

राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्येकाँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र राहुल गांधी यंनी आपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. आज आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली काँग्रेस आणि आपची आघाडी होण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. त्यापैकी प्रमुख पाच कारणे खालीलप्रमाणे आहेत.  1) दिल्लीतील सात जागांवर आघाडी करण्यासाठी काँग्रेसने आपसोबत चर्चा केली असती तर आपने गोवा, पंजाब आणि हरयाणामध्येही आघाडीचा विषय पुढे आणला असता, काँग्रेससाठी ते अडचणीचे ठरले असते. त्यामुळे काँग्रेसला केवळ दिल्लीमध्येच आपसोबत आघाडी करायची आहे.2) दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आप आग्रही आहे. त्यांनी दिल्लीतील जनतेला तसे आश्वासनही दिले आहे. मात्र काँग्रेसच्या मते हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे घाईगडबडीत यासंदर्भात आश्वासन देता येणार नाही, असे काँग्रेसचे मत आहे. तर आप या मुद्यावर माघार घेण्यास तयार नाही. 3) एकीकडे काँग्रेसशी आघाडीबाबत चर्चा सुरू असताना अरविंद केजरीवाल हे प्रसारमाध्यमांमध्ये आघाडीबाबत सातत्याने वक्तव्ये करत आहेत. तसेच आघाडीसाठी होत असलेल्या उशिराचे खापर काँग्रेसच्या माथ्यावर फोडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे.4) आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य आहे. पण आम आदमी पक्षाच्या एकंदरीत धोरणामधून त्यांच्या हेतूबाबत शंका येत होती. आप हा काँग्रेसचा मित्र आहे की शत्रू हेच काँग्रेलला ठरवता येत नव्हते. त्यामुळे आपवर विश्वास ठेवणे काँग्रेसला काहीसे कठीण होत आहे. 5) एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असतानाच दिल्लीतील सातही जागांवर बलाढ्य उमेदवार उतरवण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. तसेच दिल्लीतील आपल्या आक्रमक अभियानासाठी दिल्लीती 70 आमदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे दिल्लीत तिरंगी लढल होण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdelhiदिल्लीcongressकाँग्रेसAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधी