शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

या कारणांमुळे दिल्लीतील काँग्रेस-आप आघाडीच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:21 IST

राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्येकाँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र राहुल गांधी यंनी आपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. आज आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली काँग्रेस आणि आपची आघाडी होण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. त्यापैकी प्रमुख पाच कारणे खालीलप्रमाणे आहेत.  1) दिल्लीतील सात जागांवर आघाडी करण्यासाठी काँग्रेसने आपसोबत चर्चा केली असती तर आपने गोवा, पंजाब आणि हरयाणामध्येही आघाडीचा विषय पुढे आणला असता, काँग्रेससाठी ते अडचणीचे ठरले असते. त्यामुळे काँग्रेसला केवळ दिल्लीमध्येच आपसोबत आघाडी करायची आहे.2) दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आप आग्रही आहे. त्यांनी दिल्लीतील जनतेला तसे आश्वासनही दिले आहे. मात्र काँग्रेसच्या मते हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे घाईगडबडीत यासंदर्भात आश्वासन देता येणार नाही, असे काँग्रेसचे मत आहे. तर आप या मुद्यावर माघार घेण्यास तयार नाही. 3) एकीकडे काँग्रेसशी आघाडीबाबत चर्चा सुरू असताना अरविंद केजरीवाल हे प्रसारमाध्यमांमध्ये आघाडीबाबत सातत्याने वक्तव्ये करत आहेत. तसेच आघाडीसाठी होत असलेल्या उशिराचे खापर काँग्रेसच्या माथ्यावर फोडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे.4) आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य आहे. पण आम आदमी पक्षाच्या एकंदरीत धोरणामधून त्यांच्या हेतूबाबत शंका येत होती. आप हा काँग्रेसचा मित्र आहे की शत्रू हेच काँग्रेलला ठरवता येत नव्हते. त्यामुळे आपवर विश्वास ठेवणे काँग्रेसला काहीसे कठीण होत आहे. 5) एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असतानाच दिल्लीतील सातही जागांवर बलाढ्य उमेदवार उतरवण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. तसेच दिल्लीतील आपल्या आक्रमक अभियानासाठी दिल्लीती 70 आमदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे दिल्लीत तिरंगी लढल होण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdelhiदिल्लीcongressकाँग्रेसAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधी