शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

अवकाळी गारपिटीने दहा हजार हेक्टर पिकांचे नुकसान

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

कृषी विभागाचा अंदाज, नऊ तालुक्यांना फटका, वडनेरला गारपीट

कृषी विभागाचा अंदाज, नऊ तालुक्यांना फटका, वडनेरला गारपीट
नाशिक : जिल्‘ात अवकाळी पावसाचे व गारपिटीचे थैमान सुरूच असून, गुरुवारी (दि.११) जिल्‘ात सात तालुक्यांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाला दिला आहेत.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जिल्‘ात काही तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, कांदा, डाळींब, गहू, हरबरा पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने प्राथमिक नुकसान झालेल्या गावांची नावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- कंसात झालेल्या पिकांचे नुकसान- बागलाण- ब्राšाणगाव, लखमापूर, यशवंतनगर,धांद्री, (कांदा, द्राक्ष, डाळींब), चांदवड- मंगरूळ, सोग्रस, चिंचोले, भरवीर, साळसाने (कांदा व द्राक्ष) निफाड-रूई, सारोळेथडी, धारणगाव वीर, खेडलेझुंगे, नांदूरमधमेश्वर,महादेवनगर, विंचूर, देवगाव, मानूर (द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा) सुमारे एक हजार हेक्टर, मालेगाव- रावळगाव, तळवाडे, दुधे, सातमाने, वडनेर (खा), मोडदर, निमशेवडी, वडेल, अजंग, खायदे (डाळींब, गहू व हरभरा), येवला- मानुरी, मुखेड, देवगाव, एरंडगाव (द्राक्ष, कांदा), देवळा-वासूळपाडा, महालपाटणे, निंबोळा, वाखारी, डोंगरगाव, पिंपळगाव, उमराणे (कांदा, डाळींब) सिन्नर- मुसळगाव, खोपडी, कुंदेवाडी (कांदा, हरभरा, गहू), नांदगाव-जळगाव(बु.) चिंचविहीर (कांदा, हरभरा, गहू) आदि गावांमध्ये सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.(प्रतिनिधी)
इन्फो..
वडनेरला गारपीट
गुरुवारनंतर शुक्रवारी पुन्हा चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावासह अन्य काही भागांत गारपीट झाली. वडनेर भैरव गावात झालेल्या गारपिटीने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ज्योती बाळासाहेब माळी यांंनी दिली. तसेच नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी ज्योती बाळासाहेब माळी यांनी केली आहे.
इन्फो..
रब्बीच्या पेरण्यांना वेग
गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आला असून, मागील आठवड्यापर्यंत अवघ्या २७ टक्के क्षेत्रावर असलेल्या रब्बी पेरण्या शुक्रवारी (दि, १२) सुमारे ४० टक्के क्षेत्रावर पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र २ १ लाख ३२ हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी ५७ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या आटोपल्या आहेत. पेरण्या झालेल्या क्षेत्रापैकी प्रामुख्याने गहू- २८ हजार ९८८ हेक्टर, हरभरा - २१ हजार ४६७, ज्वारी- ४८९०, तृणधान्य-३६०९, कडधान्य-३०९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत.