शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारतासमोर नवं संकट उभं राहणार? देशातील अनेक गावं, शहरं अंधारात जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 06:37 IST

१६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे. कंपन्यांकडे आठवडाभर पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. 

ठळक मुद्देचीनमध्ये सध्या कोळशाच्या खाणींच्या स्थितीचा आढावा घेतला जात असल्याने तेथे उत्पादन घटलेयुरोपात आता थंडीची चाहूल लागू लागली आहे. त्यामुळे तेथे विजेची मागणी वाढलीकोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली

कोरोनातून थोडी उसंत मिळत असताना जागतिक अर्थव्यवस्थेपुढे अनेक नवनवी संकटे उभी ठाकत आहेत. ब्रिटनमध्ये इंधनाची तर चीन-युरोपात विजेची तीव्र टंचाइ निर्माण झाली आहे. भारतातही कोळशाच्या अभावी वीजनिर्मात्या कंपन्यांचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. एकूणच इंधन, वीज आणि कोळसा यांचे संकट तीव्र होऊ लागले आहे. 

संकट येण्याचे कारण काय?देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे. कंपन्यांकडे आठवडाभर पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. 

कोळशाची टंचाई का?

  • कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर औद्योगिक उत्पादन वाढू लागले आहे. 
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरही कोळशाच्या किमती विक्रमी स्तरावर आहेत. 
  • देशांतर्गत कोळशाच्या किमती कमी आहेत. किमतीतील या तफावतीमुळे कोळशावर आधारित वीजकंपन्यांचे धाबे दणाणले आहे. 

 

चीनमधील संकटचीनमध्ये सध्या कोळशाच्या खाणींच्या स्थितीचा आढावा घेतला जात असल्याने तेथे उत्पादन घटले आहे. कोळशाच्या टंचाईमुळे चीनमध्येही वीजनिर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे तिथे अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये आता स्थानिक थर्मल कोळशाला महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.  ४४ टक्के चिनी कंपन्यांना या सगळ्याचा फटका बसला आहे. 

युरोपातही वीजसंकटयुरोपात आता थंडीची चाहूल लागू लागली आहे. त्यामुळे तेथे विजेची मागणी वाढली आहे. पुरवठा मात्र घटला आहे. नैसर्गिक वायूनिर्मितीत घट, सौरऊर्जेत घट आणि पवनऊर्जेतील घट यांमुळे युरोपातही वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच ब्रिटनमध्ये इंधनाची टंचाई निर्माण झाल्याने संकट अधिकच गहिरे झाले आहे.  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनPower Shutdownभारनियमन