शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे राम मंदिराच्या तयारीला 'ब्रेक', 30 एप्रिलला होणारे भूमीपूजन पुढे ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 09:49 IST

देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे  संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे30 एप्रिलला होणार होते राम मंदिराचे भूमीपूजदेशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत करण्यात येणार नाही भूमीपूजनउत्तर प्रदेशमधील 52 जिल्ह्यांतील 1184 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण

अयोध्या : देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आता राम मंदिर निर्माणाच्या तयारीलाही ब्रेक लागल्याचे दिसत आहे. 30 एप्रिलला राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी देशातील काही निवडक संत आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोना व्हायरसमुळे योग्य परिस्थिती नसल्याने कुठल्याही प्रकारच्या उत्सवाचे आयोजन करणे योग्य नाही, असे चंपत राय यांनी म्हटले आहे.

भूमीपूजनाला ब्रेक -लाइव्ह हिंदुस्तानने दिलेल्या एका वृत्तानुसार, देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे  संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या संपूर्ण योजनेप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रामललाची नव्या भवनात प्रतिष्ठापना करून, वैशाख नवरात्र संपल्यानंतर 30 एप्रिलला भूमीपूजनाबरोबरच राम मंदिराच्या निर्माणालाही सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

उत्तर प्रदेशात सातत्याने समोर येतायेत नवे रुग्ण -उत्तर प्रदेशातही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. सध्या राज्यातील मऊ, एटा आणि सुल्तानपूर येथे नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील 52 जिल्ह्यांतील 1184 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

प्रसाद म्हणाले, की सोमवारी एकूण 3268 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात 1184 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यातील 78 टक्के पुरुष असून इतर सर्व महिला आहेत. तसेच 28 दिवसांपासून एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 140 जणांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश