शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोरोनामुळे राम मंदिराच्या तयारीला 'ब्रेक', 30 एप्रिलला होणारे भूमीपूजन पुढे ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 09:49 IST

देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे  संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे30 एप्रिलला होणार होते राम मंदिराचे भूमीपूजदेशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत करण्यात येणार नाही भूमीपूजनउत्तर प्रदेशमधील 52 जिल्ह्यांतील 1184 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण

अयोध्या : देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आता राम मंदिर निर्माणाच्या तयारीलाही ब्रेक लागल्याचे दिसत आहे. 30 एप्रिलला राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी देशातील काही निवडक संत आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोना व्हायरसमुळे योग्य परिस्थिती नसल्याने कुठल्याही प्रकारच्या उत्सवाचे आयोजन करणे योग्य नाही, असे चंपत राय यांनी म्हटले आहे.

भूमीपूजनाला ब्रेक -लाइव्ह हिंदुस्तानने दिलेल्या एका वृत्तानुसार, देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे  संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या संपूर्ण योजनेप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रामललाची नव्या भवनात प्रतिष्ठापना करून, वैशाख नवरात्र संपल्यानंतर 30 एप्रिलला भूमीपूजनाबरोबरच राम मंदिराच्या निर्माणालाही सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

उत्तर प्रदेशात सातत्याने समोर येतायेत नवे रुग्ण -उत्तर प्रदेशातही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. सध्या राज्यातील मऊ, एटा आणि सुल्तानपूर येथे नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील 52 जिल्ह्यांतील 1184 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

प्रसाद म्हणाले, की सोमवारी एकूण 3268 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात 1184 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यातील 78 टक्के पुरुष असून इतर सर्व महिला आहेत. तसेच 28 दिवसांपासून एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 140 जणांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश