शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

बदकांमुळे वाढतो पाण्यात ऑक्सिजन; विप्लव देव यांचा 'शोध'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:59 IST

नीरमहल येथे नौकानयन स्पर्धेचा शुभारंभ करताना त्यांनी आपली 'मते' मांडली.

आगरतळा- अत्यंत विचित्र विधानांमुळे चर्चेत येणाऱ्या विप्लव देव यांनी आता एक नवे विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. पाण्यात बदक पोहल्यामुळे पाण्यात ऑक्सिजन वाढतो असे विधान त्यांनी केले आहे. पाण्यात ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यासाठी ते संपूर्ण राज्यात बदकांचे वाटप करण्याचा विचार करत आहेत.देव यांच्या मते, बदक वाटल्यामुळे ग्रामिण अर्थव्यवस्थेत तेजी येईल. बदक पाण्यात पोहल्यामुळे पाण्याचे रिसायकलिंग होते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. नीरमहल येथे नौकानयन स्पर्धेचा शुभारंभ करताना त्यांनी आपली 'मते' मांडली. विप्लव देव त्यांच्या सरकारतर्फे मासेमारी करणाऱ्या लोकांना 50 हजार बदकांचे वाटप करणार आहेत. जलाशयांच्या शेजारी पर्यटन केंद्रांजवळ यांचे वाटप होईल आणि त्यामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडेल व ग्रामिण अर्थव्यवस्थेत भर पडेल असे त्यांना वाटते.

या संदर्भात देव म्हणाले, जेव्हा बदक पाण्यात पोहतात तेव्हा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण आपोआप वाढते. त्यामुळे ऑक्सिजनचे रिसायकलिंग होते. पाण्यातील माशांना अधिक ऑक्सिजन मिऴतो. मग मासेही मोठ्या संख्येने वाढतात व नैसर्गिक पद्धतीने मत्स्यपालनाची वृद्धी होते. विप्लव देव त्यांच्या अशा विधानांमुळे चर्चेत येतात. मॉब लिचिंगमागे परदेशी षडयंत्र असल्याचेही विधान त्यांनी केले होते.

त्रिपुरात ‘एनआरसी’ची आवश्यकता नाही

यापुर्वी विप्लव देव यांनी अनेकदा अशी विधाने केली होती. याआधी त्यांनी एकदा आपल्या कामात नाक खुपसायचा प्रयत्न केल्यास मी त्याची नखंच तोडून टाकेन असं विधान केलं होतं. सकाळी ८ वाजता भाजी विक्रेता बाजारात दुधी घेऊन येतो आणि ९ वाजेपर्यंत त्यांची पार वाट लागते. कारण, येणारा प्रत्येक ग्राहक या दुधीला नखं लावत असतो. मी असं होऊ देणार नाही.  माझ्या सरकारला कुणीही हात लावू शकत नाही. त्यात कुणी नाक खुपसलं, हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर मी त्यांची नखंच तोडून टाकेन', असं विधान करून विप्लव देव यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतला होता.

मोदी 'हिऱ्या'ला दाखवणार हिसका; बिप्लब देब यांना वादग्रस्त विधानं भोवणारत्रिपुरामध्ये भाजपानं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, तरुण-तडफदार विप्लव देव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली होती. त्यांच्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या असताना, एका भलत्याच विधानामुळे ते प्रकाशझोतात आले. महाभारत काळातही इंटरनेट आणि सॅटेलाइट अस्तित्वात होतं, असं अजब तर्कट त्यांनी मांडलं होतं. त्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक थांबते न थांबते, तोच मिस युनिव्हर्स डायना हेडन हिचं जिंकणं फिक्सिंग होतं, असा दावा त्यांनी केला. त्यावरूनही खल झाला. पण, विप्लव देव स्वस्थ बसले नाहीत. तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा पान टपऱ्या उघडाव्यात, गायी पाळाव्यात, असा विचित्र सल्ला देऊन ते पुन्हा टीकेचे धनी ठरले होते.

 

टॅग्स :Biplab Debबिप्लब देवTripuraत्रिपुराChief Ministerमुख्यमंत्री