शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जय हो! भारतानं जगाला दाखवली ताकद, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 19:53 IST

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे.  भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

पोर्ट ब्लेअर-

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे.  भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (Diffence Research and Development Organization) आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि इतर संरक्षण अधिकारी उपस्थित होते. क्षेपणास्त्रानं आपल्या लक्ष्यावर अचूक मारा केल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्याने दिली आहे. 

एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केलं. ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी ते अंदमान आणि निकोबार बेटावर उपस्थित होते. यापूर्वी, ८ डिसेंबर २०२१ रोजी, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या एअर व्हर्जनची हवाई दलाच्या लढाऊ विमान सुखोई-30MK-1 मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. मिसाइलनं निर्धारित मानकांची पूर्तता करत क्षेपणास्त्रानं शत्रूचं ठिकाण नष्ट केलं होतं. सुखोई-३० एमके-१ फायटर जेटमध्ये बसवण्यात आलेले ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी स्तरावर विकसित करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, भारतीय हवाई दलासाठी ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राचं अपग्रेडेड एअर लॉन्च व्हर्जन तयार केलं जात आहे. त्याची रेंज 800 किमी असेल. म्हणजेच आपली लढाऊ विमानं हवेत असताना एवढ्या दूरवरून शत्रूचं स्थान नष्ट करू शकतील. भारत आता नव्या रणनीतीनुसार क्षेपणास्त्रांची रेंज सातत्यानं वाढवत आहे. फक्त एका सॉफ्टवेअर अपग्रेडसह, क्षेपणास्त्राची श्रेणी 500 किमीनं वाढते. ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलाच्या 40 सुखोई-30 MKI लढाऊ विमानांवर तैनात करण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रं अत्यंत अचूक आणि शक्तिशाली असून शत्रूच्या तळांना पूर्णपणे नष्ट करू शकतात.

टॅग्स :DRDOडीआरडीओIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलIndiaभारत