शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

2004 ची चूक करू नका..., लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींची मंत्र्यांना महत्वाची सूचना; काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 14:35 IST

देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना महत्वाची सूचना दिला आहे. मोदी म्हणाले, मंत्र्यांनी कोणत्याही राजकीय विश्लेषकाला बळी पडू नये. आणि आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. खरे तर, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे संपूर्ण देशात भाजपसाठी अनुकूल वातावरण झाले असतानाच मोदींनी आपल्या मंत्र्यांना अशा प्रकारची सूचना दिली आहे.

जोवर काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते पूर्ण झाले असे म्हटले जाऊ शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे. खरे तर, भाजपला अजूनही 2004 ची निवडणूक लक्षात आहे. तेव्हा भाजपचे नेतृत्व शेवटच्या क्षणी काही प्रमाणावर गाफील झाले होते आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भाजपपेक्षा अवघ्या सात जागांनी लोकसभेत सर्वात मोठा पक्ष बनला. एवढेच नाही तर, पुढील 10 वर्षे सत्तेत राहिला. यावेळी, काँग्रेसने यूपीए आघाडी स्थापन केली होती आणि मनमोहन सिंग सलग दोन वेळा पंतप्रधान झाले होते.

देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना या निवडणुकीच्या बाबतीत गाफील राहायचे नाही. बहुदा यामुळे भाजपने बिहारमध्ये JD(U) सोबत पुन्हा एकदा युती केली आणि ओडिशात BJD सोबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक