शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सरकार अस्थिर होऊ देऊ नका; संबित पात्रांनी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 20:31 IST

देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे असे नमूद करून पात्र म्हणाले, की अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीच देशभर साधनसुविधांचे जाळे विणले जात आहे.

पणजी : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), तिहेरी तलाक, काश्मिरचे 370 कलम असे अनेक प्रश्न गेली सत्तर वर्षे सुटले नव्हते पण मोदी सरकारने ते सोडवले. लोकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी या निर्णयांसोबत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ठामपणे रहावे. विरोधक देशाला व सरकारलाही अस्थिर करू पाहत आहेत पण तुम्ही सरकार अस्थिर होऊ देऊ नका असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी येथे केले.

गोव्यातील काही चार्टड अकाऊण्टंट्स, सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी पात्र यांनी पणजीत संवाद साधला. सध्याचा भारत हा नवा भारत आहे व त्याचदृष्टीकोनातून मोदी सरकारने देशाला चांगला अर्थसंकल्प कसा दिला हे स्पष्ट करण्यासाठी संबित पात्रा गोव्यात आले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, विनय तेंडुलकर आदी यावेळी व्यासपीठावर होते.

देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे असे नमूद करून संबित पात्रा म्हणाले, की अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीच देशभर साधनसुविधांचे जाळे विणले जात आहे. मोदी चांगले काम करत आहेत पण देशातील काही विरोधी शक्ती मोदींना विरोध करता करता देशाला विरोध करू लागल्या आहेत. स्व. राजीव गांधी यांच्या सरकारला काही शक्तींनी शहाबानो प्रकरणी ब्लॅकमेल करून निर्णय फिरवायला भाग पाडले होते. सीसीएप्रश्नीही तशाच प्रकारे या शक्ती मोदी सरकारला ब्लॅकमेल करू पाहत आहेत. त्या शक्ती मोदी सरकारने माघार घ्यावी म्हणून वातावरण दुषित करत आहेत. अशावेळी तुम्ही सर्वानी एखाद्या मोठ्या अभेद्य खडकाप्रमाणो मोदी सरकारच्या मागे रहावे.

देशात आणि गोव्यातही भाजप सरकार अधिकारावर आल्यानंतरच साधनसुविधा निर्माणाच्या कामांना वेग आला. मोदी दुसऱ्यांदा प्रचंड जागा प्राप्त करून सत्तेवर आले. मोदी सरकारला जागा सहानुभूतीमुळे मिळाल्या नाही तर त्यांच्यात आपली स्वप्ने साकार करणारे नेतृत्व देशाने पाहिले व त्यांच्या नेतृत्वाला मते दिली. काश्मिरमध्ये 370 कलम हटविले गेल्यामुळे आज काश्मिरात शांतता आहे. 73 टक्के सैनिकांचे प्राण त्यामुळे वाचले आहेत.

70 वर्षे जे प्रश्न सुटले नाहीत, ते प्रश्न सोडविण्यास मोदी यांनी प्राधान्य दिले. तसे प्राधान्य दिले नसते तर त्यांना निवडणुकीवेळी मिळालेल्या प्रचंड बहुमताचा व जनमताचा तो विश्वासघात ठरला असता, असे संबित पात्रा म्हणाले. देशाला उर्जा असलेला तपस्वी पंतप्रधान लाभला आहे. त्यामुळेच अमेरिका देखील भारताचा सन्मान करते. ट्रम्प यांनी मोठी परिपक्वता दाखवली व त्यांनी सीएएवर विरोधी भाष्य करणो टाळले, असेही संबित पात्रा यांनी नमूद केले.

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राBJPभाजपाgoaगोवाcongressकाँग्रेसPramod Sawantप्रमोद सावंत