शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुलींना मोबाईल देऊ नका, बलात्काराच्या प्रश्नावर महिला आयोगाच्या सदस्यांचं अजबच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 00:15 IST

मुली या सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असे मीना कुमारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

ठळक मुद्देमुली या सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असे मीना कुमारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

लखनौ - उत्तर प्रदेशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असून नुकतेच अलीगढ येथे आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. राज्यातील बलात्काराच्या घटनांसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या सदस्य मीना कुमारी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना वादग्रस्त विधान कुमारी यांनी केलं आहे. मीना कुमारी यांनी मुलींच्या हालचालींवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आपल्या मुली कुठे जातात, काय करतात याकडे पाहिलं पाहिजे असं मीना कुमारी यांनी म्हटलंय. 

मुली या सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असे मीना कुमारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. अलीगढसह राज्यातील बलात्कारांच्या वाढत्या घटनांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर प्रदेशमहिला आयोगाच्या सदस्य असलेल्या मीना कुमारी यांनी अजबच उत्तर दिलंय. मीना कुमारी यांच्या या उत्तरावरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

कालच माझ्याकडे एक मॅटर आला होता, वाल्मिकीची मुलगी आणि जाट समाजाचा मुलगा, ते माझ्याकडे आले होते. लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकल्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यावेळी, गावातील लोकांनी पंचायत बोलावून, आम्ही त्यांना घरात घुसू देणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे, मुलींना मोबाईल देऊ नका, असे आवाहनच मीना कुमारी यांनी केले आहे. जर, देत असाल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा, आईने दुर्लक्ष केल्यानंतरच मुलींची अशी अवस्था होते, असेही मीना कुमारी यांनी म्हटलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशMobileमोबाइलPoliceपोलिसWomenमहिला