शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 10:56 IST

गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता.

बेंगळुरु : कर्नाटकात गेल्यावर्षीपासून काँग्रेस-निजदने हात मिळवत सत्ता स्थापन केली आहे. यामुळे निवडणुकीत बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपद हातचे गेल्याने येडीयुराप्पांनी संधी मिळेल तेव्हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर केंद्रातील नव्या मोदी सरकारने येडीयुराप्पांनाच तंबी दिली आहे. 

याबाबतची माहिती खुद्द येडीयुराप्पांनीच दिली आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. मात्र, मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना स्थान न दिल्याने नाराजी पसरली होती. तसेच काँग्रेसचे नेते काम करू न देता त्रास देत असल्याचे सांगत कुमारस्वामींनीही अश्रु गाळले होते. यामुळे गुढघ्याला बाशिंग बांधून असलेल्या येडीयुराप्पांना दरवेळी संधी दिसत होती. यामुळे त्यांनी आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले होते. 

येडीयुराप्पांनी सांगितले की, मी नुकताच दिल्लीहून आलो असून वरिष्ठ नेत्यांनी कर्नाटकचे सरकार अस्थिर होईल असे कोणतेही कृत्य करू नये अशा सूचना केल्या आहेत. राजकीय फायद्यासाठी सिद्धरामय्या त्यांचे काही आमदार माझ्याकडे पाठवू शकतात असे मला वाटते. मात्र, आम्ही आताही शांत आहेत. ते आपापसात लढू शकतात आणि काहीही होऊ शकते. 

कर्नाटकच्या सरकारला कोणताही धोका नाही. काँग्रेसचे 79 आणि निजदचे 37 आमदार आहेत. भाजपाकडे 104 आमदार आहेत. लोकसभेदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद झाले होते. यावेळी काँग्रेसने दोन नेत्यांना वाद सोडविण्यासाठी पाठविले होते. यावेळी काँग्रेसने सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. येडीयुराप्पांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे 20 आमदार भाजमध्ये येणार असल्याचे वक्तव्य केले होते. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा