शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 10:56 IST

गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता.

बेंगळुरु : कर्नाटकात गेल्यावर्षीपासून काँग्रेस-निजदने हात मिळवत सत्ता स्थापन केली आहे. यामुळे निवडणुकीत बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपद हातचे गेल्याने येडीयुराप्पांनी संधी मिळेल तेव्हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर केंद्रातील नव्या मोदी सरकारने येडीयुराप्पांनाच तंबी दिली आहे. 

याबाबतची माहिती खुद्द येडीयुराप्पांनीच दिली आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. मात्र, मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना स्थान न दिल्याने नाराजी पसरली होती. तसेच काँग्रेसचे नेते काम करू न देता त्रास देत असल्याचे सांगत कुमारस्वामींनीही अश्रु गाळले होते. यामुळे गुढघ्याला बाशिंग बांधून असलेल्या येडीयुराप्पांना दरवेळी संधी दिसत होती. यामुळे त्यांनी आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले होते. 

येडीयुराप्पांनी सांगितले की, मी नुकताच दिल्लीहून आलो असून वरिष्ठ नेत्यांनी कर्नाटकचे सरकार अस्थिर होईल असे कोणतेही कृत्य करू नये अशा सूचना केल्या आहेत. राजकीय फायद्यासाठी सिद्धरामय्या त्यांचे काही आमदार माझ्याकडे पाठवू शकतात असे मला वाटते. मात्र, आम्ही आताही शांत आहेत. ते आपापसात लढू शकतात आणि काहीही होऊ शकते. 

कर्नाटकच्या सरकारला कोणताही धोका नाही. काँग्रेसचे 79 आणि निजदचे 37 आमदार आहेत. भाजपाकडे 104 आमदार आहेत. लोकसभेदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद झाले होते. यावेळी काँग्रेसने दोन नेत्यांना वाद सोडविण्यासाठी पाठविले होते. यावेळी काँग्रेसने सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. येडीयुराप्पांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे 20 आमदार भाजमध्ये येणार असल्याचे वक्तव्य केले होते. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा