शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 10:56 IST

गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता.

बेंगळुरु : कर्नाटकात गेल्यावर्षीपासून काँग्रेस-निजदने हात मिळवत सत्ता स्थापन केली आहे. यामुळे निवडणुकीत बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपद हातचे गेल्याने येडीयुराप्पांनी संधी मिळेल तेव्हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर केंद्रातील नव्या मोदी सरकारने येडीयुराप्पांनाच तंबी दिली आहे. 

याबाबतची माहिती खुद्द येडीयुराप्पांनीच दिली आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. मात्र, मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना स्थान न दिल्याने नाराजी पसरली होती. तसेच काँग्रेसचे नेते काम करू न देता त्रास देत असल्याचे सांगत कुमारस्वामींनीही अश्रु गाळले होते. यामुळे गुढघ्याला बाशिंग बांधून असलेल्या येडीयुराप्पांना दरवेळी संधी दिसत होती. यामुळे त्यांनी आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले होते. 

येडीयुराप्पांनी सांगितले की, मी नुकताच दिल्लीहून आलो असून वरिष्ठ नेत्यांनी कर्नाटकचे सरकार अस्थिर होईल असे कोणतेही कृत्य करू नये अशा सूचना केल्या आहेत. राजकीय फायद्यासाठी सिद्धरामय्या त्यांचे काही आमदार माझ्याकडे पाठवू शकतात असे मला वाटते. मात्र, आम्ही आताही शांत आहेत. ते आपापसात लढू शकतात आणि काहीही होऊ शकते. 

कर्नाटकच्या सरकारला कोणताही धोका नाही. काँग्रेसचे 79 आणि निजदचे 37 आमदार आहेत. भाजपाकडे 104 आमदार आहेत. लोकसभेदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद झाले होते. यावेळी काँग्रेसने दोन नेत्यांना वाद सोडविण्यासाठी पाठविले होते. यावेळी काँग्रेसने सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. येडीयुराप्पांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे 20 आमदार भाजमध्ये येणार असल्याचे वक्तव्य केले होते. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा