डोंगरगाव टोलनाक्याचे बुथ पाडणे सुरू
By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30
डोंगरगाव टोलनाक्याचे बुथ पाडणे सुरू

डोंगरगाव टोलनाक्याचे बुथ पाडणे सुरू
ड ंगरगाव टोलनाक्याचे बुथ पाडणे सुरू वाहतूक होणार सुकर : अपघाताचे प्रमाण वाढलेनागपूर : नागपूर - हैदाराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ७ वरील डोंगरगाव शिवारातील टोलनाका उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आला होता. या नाक्यामुळे वाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने तो जमीनदोस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने सुकर होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये हा टोलनाका बंद करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बुथमुळे वाहनांचा वेग कमी करावा लागायचा. त्यामुळे रहदारीस अडसर निर्माण व्हायचा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने या महामार्गावरील जामठा ते बोरखेडी दरम्यानच्या मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीचा कंत्राट ओरिएन्टल कंपनीला देण्यात आला होता. सदर कंपनीने या कामासाठी खर्च केलेली रक्कम वसूल करण्यासाठी मनसर आणि डोंगरगाव शिवारात टोल नाक्याच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, नागपूर आणि बुटीबोरी येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी या नाक्याला विरोध दर्शविला होता. त्यामुळे न्यायालयाने हा नाका बोरखेडी शिवारात स्थानांतरित करण्याचा निर्णय दिला होता. त्याअनुषंगाने कंपनीने बोरखेडी शिवारात नाका तयार करून टोल वसुलीला सुरुवात केली. त्यातच डोंगरगाव नाक्याजवळील पथदिवे व पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला. रात्रीच्यावेळी येथे अंधार असल्याने अपघात होतात. शिवाय, परिसरात घाण पसरली आहे. त्यामुळे हा नाका हटविण्याची मागणी नागरिक समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्रीराम मिश्रा यांना दिलेल्या निवेदनात केली होती. (प्रतिनिधी)----------चौकट--------बोरखेडी टोलनाका बंद करानागपूर - चंद्रपूर महामार्गावरील बोरखेडी शिवारात तयार करण्यात आलेला टोलनाका बंद करण्याची मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली असून, यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब पठाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कोणतीही दुरुस्ती न करता येथे टोल वसूल केला जात असल्याने हा नाका आठ दिवसांत बंद करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता बळावल्याचा आरोपही करण्यात आला. ***