शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

डोकलाम वाद - रात्री दोन वाजता पार पडलेल्या त्या तीन तासांच्या बैठकीनंतर झाला भारताचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 12:16 IST

रात्रीचे दोन वाजले असताना डोकलाम वादावर चर्चा करण्यासाठी विजय गोखले आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक सुरु होते. तोडगा निघावा यासाठी सुरु असलेली भारत आणि चीनमधील ही बैठक जवळपास तीन तास सुरु होती. या तीन तासांच्या चर्चेनंतर सकारात्मक विचार करत शेजारी राष्ट्रांमधील नव्या नात्याला सुरुवात झाली.

ठळक मुद्देरात्री दोन वाजता डोकलाम वादावर चर्चा करण्यासाठी विजय गोखले आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक पार पडलीतणाव संपवण्यामध्ये दोन्ही देशाचे प्रमुख नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांची सक्रीय भूमिका होतीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी परराष्ट्र मंत्रालयाला अत्यंत शांतपणाने प्रकरण हाताळण्याचा आदेश दिला होता

नवी दिल्ली, दि. 9 - गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात 27 ऑगस्टच्या संध्याकाळी चीनमधील भारतीय राजदूत विजय गोखले यांना सांगितलं जातं की, तुमची लवकरात लवकर भेट कशी होईल यासाठी चीन उत्सुक आहे. विजय गोखले यांच्याकडून कळवलं जातं की, मी सध्या हाँगकाँगमध्ये आहे, आणि जर बीजिंगला येणारी पहिली फ्लाईट पकडली तर मध्यरात्री पोहोचू शकेन. यानंतर जेवढ्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर बीजिंगला पोहोचण्यास त्यांना सांगण्यात येतं. डोकलामचा वाद संपवण्यासाठी चीनकडून उचलण्यात आलेलं हे पहिलं पाऊल असून, हा त्यांच्याकडून मिळालेला स्पष्ट संकेत होता. 

रात्रीचे दोन वाजले असताना डोकलाम वादावर चर्चा करण्यासाठी विजय गोखले आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक सुरु होते. तोडगा निघावा यासाठी सुरु असलेली भारत आणि चीनमधील ही बैठक जवळपास तीन तास सुरु होती. या तीन तासांच्या चर्चेनंतर सकारात्मक विचार करत शेजारी राष्ट्रांमधील नव्या नात्याला सुरुवात झाली.

दुस-या दिवशी दोन्ही देशांनी डोकलाम वादावर माघार घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर इतके दिवस सुरु असलेला वाद अखेर संपला. यामुळे द्विपक्षीय संबंध मजबूत असून, संघर्ष टाळून विकासासाठी आपण कटिबद्द असल्याचं दोन्ही देशांनी दाखवून दिलं. सरकारशी संबधित एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं की, 'तणाव संपवण्यामध्ये दोन्ही देशाचे प्रमुख नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांची सक्रीय भूमिका होती. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधाचा वापर एकमकेांच्या फायद्यासाठी तसंच विकासाला चालना देण्यासाठी करावा यावर सहमीत दर्शवली'.

या संपुर्ण प्रकरणाशी संबंधित एका सरकारी अधिका-याने सांगितलं की, 'दोन्ही देशांकडे अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्यामुळे जलदगतीने विकासाच्या दिशेने वाटचाल करु शकतो यावर दोन्ही नेत्यांचं एमकत झालं होतं. एकाचं नुकसान, दुस-याचा फायदा असा विचार करणं मुर्खपणाचं ठरलं असतं असंही त्यांचं म्हणणं होतं. याचाच फायदा वाद मिटवण्यासाठी आणि ब्रिक्स परिषदेत सकारात्मक चर्चा होण्यासाठी झाला'. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तणाव वाढल्याने दोन्ही देशांना कोणताच फायदा होणार नाही असं सांगितलं होतं. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये जवळपास 73 दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेल संपला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बळाचा वापर करत परिस्थिती बदलली जाऊ शकत नाही या मताचे होते, तिथेच या वादामुळे युद्धपरिस्थिती निर्माण होऊ नये असंही त्यांनी वाटत होतं. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाला अत्यंत शांतपणाने प्रकरण हाताळण्याचा आदेश त्यांनी दिला. पक्षालाही संयम बाळगण्याचा आदेश देण्यात आला होता. पक्षाशिवाय आरएसएसशी संबंधित संघटनाही डोकलाम वादावर शांत राहिल्या. चीनकडून वारंवार भडकाऊ वक्तव्य होत असताना आपल्याकडून मात्र प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं. त्यामुळे शाब्दिक चकमक टळली. 

मोदींनी चीनसोबत सुरु असलेल्या वादाचा परिणाम व्यवसायावर होऊ दिला नाही. वाद सुरु असतानाही अनेक नेत्यांनी बीजिंगचा दौरा करत, सहकार्य करण्यावर लक्ष देण्याचं आवाहन केलं. यामुळे क्षी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोदींना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.  

टॅग्स :DoklamडोकलामIndian Armyभारतीय जवानchinaचीन