शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे RSS ला वाटते का?"; केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:45 IST

माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी भाजपच्या राजकारणाबद्दल भागवतांना काही सवाल केले आहेत. 

Delhi Vidhan Sabha Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील राजकारण ढवळून निघालं आहे. आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून काही सवाल केले आहेत. भाजपच्या राजकारणाबद्दल केजरीवालांनी प्रश्न विचारले आहेत.

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीत राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याचा आरोप भाजपवर केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अरविंद केजरीवालांचे भागवतांना सवाल

अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक भागवत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजप जे काही चुकीचे करत आहे, त्याला आरएसएसचे समर्थन आहे का?

"भाजपचे नेते उघडपणे पैसे वाटत आहेत, मते विकत घेण्याला आरएसएसचा पाठिंबा आहे का? दलित आणि पुर्वांचलकडील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून गाळली जात आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे आरएसएसला वाटते का? भाजप लोकशाहीला कमकुवत करत आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत नाहीये का?", प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना केले आहेत. 

भाजपचे केजरीवालांना प्रत्युत्तर

अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपने हल्ला चढवला. भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी केजरीवालांना पत्र लिहून उत्तर दिले आहे. 

"मी आशा करतो की, तुम्ही तुमची खोटं बोलण्याची आणि दिशाभूल करण्याची चुकीची सवय सोडून द्याल आणि तुमच्यात बदल कराल", असे मार्मिक उत्तर भाजपकडून देण्यात आले आहे. 

भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही केजरीवालांना लक्ष्य केले. "आरएसएसला पत्र लिहू नका, तर त्याच्याकडून शिका. सेवेचे व्रत घ्या. राजकीय चाली चालणं बाजूला ठेवा", असे म्हणत त्रिवेदींनी केजरीवालांना भागवतांना लिहिलेल्या पत्रावरून टोला लगावला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAAPआपdelhiदिल्ली