शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

"हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे RSS ला वाटते का?"; केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:45 IST

माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी भाजपच्या राजकारणाबद्दल भागवतांना काही सवाल केले आहेत. 

Delhi Vidhan Sabha Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील राजकारण ढवळून निघालं आहे. आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून काही सवाल केले आहेत. भाजपच्या राजकारणाबद्दल केजरीवालांनी प्रश्न विचारले आहेत.

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीत राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याचा आरोप भाजपवर केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अरविंद केजरीवालांचे भागवतांना सवाल

अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक भागवत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजप जे काही चुकीचे करत आहे, त्याला आरएसएसचे समर्थन आहे का?

"भाजपचे नेते उघडपणे पैसे वाटत आहेत, मते विकत घेण्याला आरएसएसचा पाठिंबा आहे का? दलित आणि पुर्वांचलकडील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून गाळली जात आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे आरएसएसला वाटते का? भाजप लोकशाहीला कमकुवत करत आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत नाहीये का?", प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना केले आहेत. 

भाजपचे केजरीवालांना प्रत्युत्तर

अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपने हल्ला चढवला. भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी केजरीवालांना पत्र लिहून उत्तर दिले आहे. 

"मी आशा करतो की, तुम्ही तुमची खोटं बोलण्याची आणि दिशाभूल करण्याची चुकीची सवय सोडून द्याल आणि तुमच्यात बदल कराल", असे मार्मिक उत्तर भाजपकडून देण्यात आले आहे. 

भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही केजरीवालांना लक्ष्य केले. "आरएसएसला पत्र लिहू नका, तर त्याच्याकडून शिका. सेवेचे व्रत घ्या. राजकीय चाली चालणं बाजूला ठेवा", असे म्हणत त्रिवेदींनी केजरीवालांना भागवतांना लिहिलेल्या पत्रावरून टोला लगावला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAAPआपdelhiदिल्ली