शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

"हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे RSS ला वाटते का?"; केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:45 IST

माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी भाजपच्या राजकारणाबद्दल भागवतांना काही सवाल केले आहेत. 

Delhi Vidhan Sabha Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील राजकारण ढवळून निघालं आहे. आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून काही सवाल केले आहेत. भाजपच्या राजकारणाबद्दल केजरीवालांनी प्रश्न विचारले आहेत.

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीत राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याचा आरोप भाजपवर केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अरविंद केजरीवालांचे भागवतांना सवाल

अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक भागवत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजप जे काही चुकीचे करत आहे, त्याला आरएसएसचे समर्थन आहे का?

"भाजपचे नेते उघडपणे पैसे वाटत आहेत, मते विकत घेण्याला आरएसएसचा पाठिंबा आहे का? दलित आणि पुर्वांचलकडील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून गाळली जात आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे आरएसएसला वाटते का? भाजप लोकशाहीला कमकुवत करत आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत नाहीये का?", प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना केले आहेत. 

भाजपचे केजरीवालांना प्रत्युत्तर

अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपने हल्ला चढवला. भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी केजरीवालांना पत्र लिहून उत्तर दिले आहे. 

"मी आशा करतो की, तुम्ही तुमची खोटं बोलण्याची आणि दिशाभूल करण्याची चुकीची सवय सोडून द्याल आणि तुमच्यात बदल कराल", असे मार्मिक उत्तर भाजपकडून देण्यात आले आहे. 

भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही केजरीवालांना लक्ष्य केले. "आरएसएसला पत्र लिहू नका, तर त्याच्याकडून शिका. सेवेचे व्रत घ्या. राजकीय चाली चालणं बाजूला ठेवा", असे म्हणत त्रिवेदींनी केजरीवालांना भागवतांना लिहिलेल्या पत्रावरून टोला लगावला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAAPआपdelhiदिल्ली