शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

रुग्णाच्या मृत्यूला नेहमी डॉक्टरच जबाबदार नसतात; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 10:51 IST

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : केवळ रुग्णाला वाचवता आले नाही म्हणून, वैद्यकीय निष्काळजीपणासाठी डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. डॉक्टरांनी वाजवी काळजी घेणे अपेक्षित आहे, परंतु संकटावर मात करून रुग्ण घरी परत येईलच याची खात्री कोणीही व्यावसायिक देऊ शकत नाही, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे.

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांना ९००-१००० पेक्षा जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा अनुभव होता. मात्र, नवीन कांत यांचे ३ फेब्रुवारी १९९६ रोजी निधन झाले.

त्यांच्या पत्नीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात पतीचा शस्त्रक्रियेनंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप  करत उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि हॉस्पिटलवर  सुमारे ९५ लाखांचा दावा दाखल केला. 

कमिशनने ही तक्रार फेटाळून लावताना डॉक्टरांची तज्ज्ञ टीम त्यांच्या दीर्घ आजारानंतर त्याला वाचवू शकली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला म्हणजे ऑपरेशन नंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. अपिलात सर्वोच्च न्यायालयाने या निष्कर्षाशी सहमती दर्शवत अपील फेटाळले.

- डाॅक्टरांनी एक  उपचाराऐवजी दुसऱ्याला प्राधान्य दिले म्हणून  त्यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

- वैद्यकशास्त्रामध्ये, उपचाराचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. यात  मतभेदही असू शकतात. तथापि, उपचार करताना डाॅक्टरांनी त्यांच्या सर्वोत्तम कौशल्याप्रमाणे उपचार केले काय हे महत्त्वाचे आहे. उपचार करण्यासाठी ते सक्षम व पात्र असणे  आवश्यक आहे.

- डॉक्टर फक्त तेव्हाच जबाबदार ठरतील,  जेव्हा त्यांनी क्षमतेचा व त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा वाजवी वापर  केला नसेल. -न्यायमूर्ती, अजय रस्तोगी आणि अभय एस. ओक 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdocterडॉक्टरDeathमृत्यू