शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या मृत्यूला नेहमी डॉक्टरच जबाबदार नसतात; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 10:51 IST

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : केवळ रुग्णाला वाचवता आले नाही म्हणून, वैद्यकीय निष्काळजीपणासाठी डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. डॉक्टरांनी वाजवी काळजी घेणे अपेक्षित आहे, परंतु संकटावर मात करून रुग्ण घरी परत येईलच याची खात्री कोणीही व्यावसायिक देऊ शकत नाही, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे.

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांना ९००-१००० पेक्षा जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा अनुभव होता. मात्र, नवीन कांत यांचे ३ फेब्रुवारी १९९६ रोजी निधन झाले.

त्यांच्या पत्नीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात पतीचा शस्त्रक्रियेनंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप  करत उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि हॉस्पिटलवर  सुमारे ९५ लाखांचा दावा दाखल केला. 

कमिशनने ही तक्रार फेटाळून लावताना डॉक्टरांची तज्ज्ञ टीम त्यांच्या दीर्घ आजारानंतर त्याला वाचवू शकली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला म्हणजे ऑपरेशन नंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. अपिलात सर्वोच्च न्यायालयाने या निष्कर्षाशी सहमती दर्शवत अपील फेटाळले.

- डाॅक्टरांनी एक  उपचाराऐवजी दुसऱ्याला प्राधान्य दिले म्हणून  त्यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

- वैद्यकशास्त्रामध्ये, उपचाराचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. यात  मतभेदही असू शकतात. तथापि, उपचार करताना डाॅक्टरांनी त्यांच्या सर्वोत्तम कौशल्याप्रमाणे उपचार केले काय हे महत्त्वाचे आहे. उपचार करण्यासाठी ते सक्षम व पात्र असणे  आवश्यक आहे.

- डॉक्टर फक्त तेव्हाच जबाबदार ठरतील,  जेव्हा त्यांनी क्षमतेचा व त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा वाजवी वापर  केला नसेल. -न्यायमूर्ती, अजय रस्तोगी आणि अभय एस. ओक 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdocterडॉक्टरDeathमृत्यू