शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

रुग्णाच्या मृत्यूला नेहमी डॉक्टरच जबाबदार नसतात; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 10:51 IST

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : केवळ रुग्णाला वाचवता आले नाही म्हणून, वैद्यकीय निष्काळजीपणासाठी डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. डॉक्टरांनी वाजवी काळजी घेणे अपेक्षित आहे, परंतु संकटावर मात करून रुग्ण घरी परत येईलच याची खात्री कोणीही व्यावसायिक देऊ शकत नाही, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे.

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांना ९००-१००० पेक्षा जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा अनुभव होता. मात्र, नवीन कांत यांचे ३ फेब्रुवारी १९९६ रोजी निधन झाले.

त्यांच्या पत्नीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात पतीचा शस्त्रक्रियेनंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप  करत उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि हॉस्पिटलवर  सुमारे ९५ लाखांचा दावा दाखल केला. 

कमिशनने ही तक्रार फेटाळून लावताना डॉक्टरांची तज्ज्ञ टीम त्यांच्या दीर्घ आजारानंतर त्याला वाचवू शकली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला म्हणजे ऑपरेशन नंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. अपिलात सर्वोच्च न्यायालयाने या निष्कर्षाशी सहमती दर्शवत अपील फेटाळले.

- डाॅक्टरांनी एक  उपचाराऐवजी दुसऱ्याला प्राधान्य दिले म्हणून  त्यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

- वैद्यकशास्त्रामध्ये, उपचाराचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. यात  मतभेदही असू शकतात. तथापि, उपचार करताना डाॅक्टरांनी त्यांच्या सर्वोत्तम कौशल्याप्रमाणे उपचार केले काय हे महत्त्वाचे आहे. उपचार करण्यासाठी ते सक्षम व पात्र असणे  आवश्यक आहे.

- डॉक्टर फक्त तेव्हाच जबाबदार ठरतील,  जेव्हा त्यांनी क्षमतेचा व त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा वाजवी वापर  केला नसेल. -न्यायमूर्ती, अजय रस्तोगी आणि अभय एस. ओक 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdocterडॉक्टरDeathमृत्यू