शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरनं दान केली ५ कोटींची संपत्ती; डोळ्यात पाणी आणणारी हृदयस्पर्शी कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 17:03 IST

हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका निवृत्त झालेल्या डॉक्टरनं आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती सरकारच्या नावावर केली आहे.

हमीरपूर-

हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका निवृत्त झालेल्या डॉक्टरनं आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती सरकारच्या नावावर केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या डॉक्टरांना कुणीही वारसदार नाही. त्यामुळे त्यांनी ५ कोटींहून अधिक किमतीची संपत्ती दान केली आहे. डॉक्टरांनी तयार केलेलं इच्छापत्र परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

नादौनच्या जोलसप्पड गावात सनकर येथील रहिवासी असलेले ७२ वर्षीय डॉक्टर राजेंद्र कंवर हे स्वास्थ्य विभाग आणि त्यांची पत्नी कृष्णा कंवर या शिक्षा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. गेल्या वर्षी कृष्णा कंवर यांचं निधन झालं. दोघांना कुणीही वारस नसल्यानं आपली संपूर्ण संपत्ती आपल्या पश्चात सरकारला दान करायची असं दोघांनीही ठरवलं होतं. पत्नीच्या निधनानंतर आता तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र कंवर यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत बैठक घेऊन आपली संपूर्ण संपत्ती सरकारला दान करत असल्याचं जाहीर केलं. 

पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं दानआपली संपूर्ण संपत्ती दान करताना डॉ. राजेंद्र कंवर यांनी केलेलं विधान देखील त्यांच्याप्रतीचा सन्मान वाढेल असं आहे. "ज्या लोकांना घरात राहण्यासाठी जागा दिली जात नाही आणि वृद्धापकाळात ज्यांना उन्हातान्हात भटकावं लागतं अशांसाठी सरकारनं माझ्या संपत्तीतून मदतकार्य करावं. यासाठीची अट देखील इच्छापत्रात नमूद करण्यात आली आहे", असं राजेंद्र कंवर म्हणाले. 

बेघर वृद्धांच्या निवाऱ्याची सरकारनं सोय करावीवयोवृद्ध व्यक्तींसोबत सर्वांनी नेहमीच आदर आणि प्रेम भावना ठेवावी, असं आवाहन डॉ. राजेंद्र कंवर यांनी सर्वांना केलं आहे. त्यांनी स्वत:च्या घरासोबतच राष्ट्रीय महामार्गानजिकची पाच एकर जमीन आणि गाडी देखील सरकारला दान केली आहे. त्यांनी २३ जुलै २०२१ रोजीच संपूर्ण संपत्ती सरकारच्या नावे केली असून आता एकट्यानं उर्वरित आयुष्य जगणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

घरीच करायचे अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार१९७४ साली एमबीबीएसपर्यंतचं शिक्षण डॉ. राजेंद्र कंवर यांनी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आहे. त्यानंतर प्रॅक्टीस पूर्ण केल्यानं ३ जानेवारी १९७७ साली त्यांनी भोरंज येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात चिकित्सक म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरीच्या कार्यकाळात रुग्णांप्रती सेवाभावानं काम केल्यानं त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आणि त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. डॉ. कंवर सध्या जोलसप्पड येथे आपल्या राहत्या घरीच दररोज शेकडो गरीब रुग्णांवर मोफत उपचार करतात.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरलHimachal Pradeshहिमाचल प्रदेश