शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

सिक्किमच्या पाक्योंग विमानतळाबद्दल तुम्हाला ही माहिती आहे का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 10:31 AM

विमानतळ नसणारे सिक्किम हे भारतातील एकमेव राज्य होते, पाक्योंग हे देशातील १०० वे कार्यरत असणारे विमानतळ असेल. 

 

गंगटोक- सिक्किम हे भारतातील एक चिमुकले राज्य आहे. पण भौगोलिक व लष्करीदृष्ट्या ते अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. एका बाजूला नेपाळ, दुसर्या बाजूला भूटान आणि तिसऱ्या बाजूला चीनचा तिबेट हा स्वायत्त प्रांत अशा महत्त्वपूर्ण जागी सिक्किम आहे. या महत्त्वाच्या राज्यात आता रेल्वे आणि विमानसेवा तयार होत आहे. सिक्किमचा पाक्योंग विमानतळ लोकांच्या मदतीसाठी तयार असून आता सिक्किमचे लोक त्याचा उपयोग करु शकणार आहेत. यापूर्वी सिक्किमला शेजारच्या राज्यातील बागडोगरा विमानतळाचा आधार होता, आता सिक्किमला स्वतःचे विमानतळ मिळाले आहे. 

पाक्योंग विमानतळापाठोपाठ या राज्यात रेल्वेचाही प्रवेश होणार आहे. सिक्किमने रासायनिक खते, रसायने यांच्यावर बंदी घालून देशातील पहिले व एकमेव सेंद्रीय राज्य होण्याचा सन्मान याआधीच मिळवला आहे. येत्या काळात सिक्किम १०० टक्के साक्षर होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री पवनकुमार चानलिंग यांनी नुकतेच जाहीर केले होते.

१) पाक्योंग विमानतळ भारत आणि चीन यांच्यामधील सीमेपासून केवळ ६० किमी अंतरावर आहे. या विमानतळाचा पर्यटकांसह भारतीय लष्करालाही वापर करता येईल. बागडोगरा विमानतळावर उतरुन सिक्किममध्ये जाण्यास पूर्वी पाच तासांचा प्रवास करावा लागे, आता हा प्रवासवेळ वाचणार आहे.

२) पाक्योंग विमानतळ हा भारतीय अभियत्यांनी घडवलेला चमत्कारच म्हणायला हवा. अत्यंत प्रतिकूल भौगोलिक प्रदेशात हा विमानतळ बांधला असून तो समुद्रसपाटीपासून ४५०० फूट उंचीवर आहे. 

३) विमानतळ नसणारे सिक्किम हे भारतातील एकमेव राज्य होते, पाक्योंग हे देशातील १०० वे कार्यरत असणारे विमानतळ असेल. 

४) पाक्योंग विमानतळावर स्पाइसजेट कंपनीने आधीपासूनच चाचणी उड्डाणे सुरु केली असून इतर कंपन्याही सिक्किमकडे वळण्याची शक्यता आहे. 

५) या विमानतळाच्या निर्मितीसाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 

टॅग्स :sikkimसिक्किमAirportविमानतळairplaneविमान