शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील पहिल्या सागरी सेतूबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 13:02 IST

अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्चर्य समजल्या जाणाऱ्या पांबन पुलाचा इतिहास अत्यंत रोचक आहे.

चेन्नई- तामिळनाडूतील पांबन बेटाला जोडणाऱ्या सागरी पुलाचे चित्र तुम्ही पाहिले असेल. जहाजं आणि बोटींसाठी हा पूल मधोमध उघडला जाऊन त्यांना वाट करुन देतो आणि पुन्हा एकसारखा होतो. या पुलावरुन रेल्वेची वाहतूक केली जाते. आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम आयआयटी मद्रासच्या मदतीने करण्यात येणार आहे.

1) 14 फेब्रुवारी 1914 रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. हा पूल 143 कमानींवर उभा असून त्याची लांबी 2 किलोमीटर इतकी आहे. पांबन बेट आणि भारताची मुख्य भूमी यांना जोडण्याचं मुख्य काम हा पूल करतो. मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतूची लांबी 2.3 किमी इतकी असून त्यानंतर या पुलाचाच नंबर लागतो.2) जर्मन अभियंता शेर्झेरने या पुलाचे डिझाइन तयार केले होते. हा पूल उघडल्यावर त्याखालून जहाजे, बोटी जाऊ शकतात. 1988 पर्यंत रामेश्वरमला जाण्यासाठी या पुलाचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. मात्र नंतर या पुलाला समांतर रस्त्याचा पूल तयार झाला.3) 1964 साली आलेल्या चक्रीवादळामुळे पांबन बेटाचे धनुषकोडीचे मोठे नुकसान झाले मात्र या वादळातही हा पूल टिकून राहिला. 46 दिवसांनंतंर मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांच्या प्रयत्नांमुळे तो वापरण्यास खुला झाला.4) युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये या पुलाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुलाचे मधोमध दोन भाग होऊन त्याखालून जहाज जाणे हे लोकांना आजवर आश्चर्यचकीत करत आले आहे.5) समुद्राच्या पातळीपासून हा पूल 41 फूट उंचीवर असून 2,065 मी लांब आहे. त्याचे वरखाली करता येतील असे दोन भाग असून प्रत्येक भागाचे 415 टन वजन आहे.

6) पांबन पूल बांधण्याची कल्पना 1870 साली ब्रिटिश प्रशासनाने मांडली होती. श्रीलंका (तेव्हाचे सिलोन) बरोबर व्यापार वाढविण्यासाठी या पुलाचा उपयोग त्यांना करायचा होता. मात्र प्रत्यक्षात बांधकाम सुरु होण्यासाठी 1911 सालचा ऑगस्ट महिना उजाडला व 24 फेब्रुवारी 1914 रोजी तो वापरात आला.7) मुख्यभूमीवरील मंडपम आणि पांबन ही स्थानके हा पूल जोडतो. या पूलावरून फक्त मीटर गेज रेल्वे जाऊ शकत असे मात्र 12 ऑगस्ट 2007 पासून ब्रॉड गेजची सोय सुरु झाली. पांबनमधून रेल्वेचे दोन मार्ग होतात. एक मार्ग रामेश्वरमला जातो तर दुसरा धनुषकोडीला जातो.8) आजवर या पुलासंदर्भात दोन अपघात झाले आहेत. 1964च्या चक्रीवादळामुळे रेल्वेला अपघात झाला तर जानेवारी 2013मध्ये एक बार्जचा पुलाजवळ अडकून अपघात झाला.9) आता या पुलाचे दोन्ही भाग दुरुस्त केले जाणार असून आयआयटी मद्रास त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत करणार आहे.10) रामेश्वरम या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आजवर या पुलाने लाखो भाविकांना मदत केली आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूIndiaभारतJara hatkeजरा हटके