शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भारतातील पहिल्या सागरी सेतूबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 13:02 IST

अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्चर्य समजल्या जाणाऱ्या पांबन पुलाचा इतिहास अत्यंत रोचक आहे.

चेन्नई- तामिळनाडूतील पांबन बेटाला जोडणाऱ्या सागरी पुलाचे चित्र तुम्ही पाहिले असेल. जहाजं आणि बोटींसाठी हा पूल मधोमध उघडला जाऊन त्यांना वाट करुन देतो आणि पुन्हा एकसारखा होतो. या पुलावरुन रेल्वेची वाहतूक केली जाते. आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम आयआयटी मद्रासच्या मदतीने करण्यात येणार आहे.

1) 14 फेब्रुवारी 1914 रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. हा पूल 143 कमानींवर उभा असून त्याची लांबी 2 किलोमीटर इतकी आहे. पांबन बेट आणि भारताची मुख्य भूमी यांना जोडण्याचं मुख्य काम हा पूल करतो. मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतूची लांबी 2.3 किमी इतकी असून त्यानंतर या पुलाचाच नंबर लागतो.2) जर्मन अभियंता शेर्झेरने या पुलाचे डिझाइन तयार केले होते. हा पूल उघडल्यावर त्याखालून जहाजे, बोटी जाऊ शकतात. 1988 पर्यंत रामेश्वरमला जाण्यासाठी या पुलाचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. मात्र नंतर या पुलाला समांतर रस्त्याचा पूल तयार झाला.3) 1964 साली आलेल्या चक्रीवादळामुळे पांबन बेटाचे धनुषकोडीचे मोठे नुकसान झाले मात्र या वादळातही हा पूल टिकून राहिला. 46 दिवसांनंतंर मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांच्या प्रयत्नांमुळे तो वापरण्यास खुला झाला.4) युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये या पुलाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुलाचे मधोमध दोन भाग होऊन त्याखालून जहाज जाणे हे लोकांना आजवर आश्चर्यचकीत करत आले आहे.5) समुद्राच्या पातळीपासून हा पूल 41 फूट उंचीवर असून 2,065 मी लांब आहे. त्याचे वरखाली करता येतील असे दोन भाग असून प्रत्येक भागाचे 415 टन वजन आहे.

6) पांबन पूल बांधण्याची कल्पना 1870 साली ब्रिटिश प्रशासनाने मांडली होती. श्रीलंका (तेव्हाचे सिलोन) बरोबर व्यापार वाढविण्यासाठी या पुलाचा उपयोग त्यांना करायचा होता. मात्र प्रत्यक्षात बांधकाम सुरु होण्यासाठी 1911 सालचा ऑगस्ट महिना उजाडला व 24 फेब्रुवारी 1914 रोजी तो वापरात आला.7) मुख्यभूमीवरील मंडपम आणि पांबन ही स्थानके हा पूल जोडतो. या पूलावरून फक्त मीटर गेज रेल्वे जाऊ शकत असे मात्र 12 ऑगस्ट 2007 पासून ब्रॉड गेजची सोय सुरु झाली. पांबनमधून रेल्वेचे दोन मार्ग होतात. एक मार्ग रामेश्वरमला जातो तर दुसरा धनुषकोडीला जातो.8) आजवर या पुलासंदर्भात दोन अपघात झाले आहेत. 1964च्या चक्रीवादळामुळे रेल्वेला अपघात झाला तर जानेवारी 2013मध्ये एक बार्जचा पुलाजवळ अडकून अपघात झाला.9) आता या पुलाचे दोन्ही भाग दुरुस्त केले जाणार असून आयआयटी मद्रास त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत करणार आहे.10) रामेश्वरम या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आजवर या पुलाने लाखो भाविकांना मदत केली आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूIndiaभारतJara hatkeजरा हटके